Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: त्या ४ निलंबित कामगारांना परत पूर्ववत कामावर घेण्याचे कंपनीने दिले आश्वासन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमदार रवि राणा यांच्या हस्तक्षेपाने कंपनीने काढलेल्या कामगारांना पूर्ववत कामावर घेण्याचे केले कबूल आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स चंद्रपूर -...
  • आमदार रवि राणा यांच्या हस्तक्षेपाने कंपनीने काढलेल्या कामगारांना पूर्ववत कामावर घेण्याचे केले कबूल

आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
चंद्रपूर -
मान इंजिनीरिंग कंपनी OCM नायगाव, बेलोरा उपक्षेत्र वणी या कंपनीने २०२० मध्ये कुठलेही कारण नसताना व कामगारांना कसल्याही प्रकारचे पूर्वसूचना पत्र न देता कामावरून काढले होते. त्यानंतर एकीकडे सततच्या लागणाऱ्या लॉकडाऊनमुळे या ४ कामगारांकडे कमविण्याचे कुठलेही साधन नसल्यामुळे यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. कामगारांनी कंपनी प्रशासनाला परत कामावर घेण्याकरिता विनंती केली पण काही झाले नाही. अखेर या पाच कामगारांनी युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे यांना आपली व्यथा सांगताच सुरज ठाकरे यांनी या कामगारांना परत कामावर घेण्याकरिता संबंधित विभागांमध्ये व कंपनी प्रशासनाला पत्रव्यवहार करून विनंती केली व तेवढ्यावरच न थांबता दिनांक १६ जुलै २०२१ रोजी युवा स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार रवि राणा व खासदार नवनीत रवी राणा यांची भेट घेऊन चंद्रपूर जिल्ह्यातील विविध विषयांसह चर्चा केली. त्या ४ कामगारांचा देखील विषय मांडला. त्यानंतर आमदार रवी राणा यांनी या ४ कामगारांना परत कामावर घेण्याकरिता कंपनी प्रशासनाला विनंती करताच कंपनीने रवीभाऊ राणा यांच्या विनंतीचा मान ठेवत व कामगारांच्या आर्थिक परिस्थितीकडे पाहता माणुसकीचा दृष्टिकोन ठेवून कंपनी मालकाने परत काढलेल्या कामगारांना पूर्ववत कामावर घेण्याचे कबूल केले. यानंतर युवा स्वाभिमान पक्षाने व जय भवानी कामगार संघटनेने कंपनी मालकाचे देखील आभार मानले व भविष्यात अशा प्रकारे कुठल्याही कामगारांवर अन्याय होऊ नये याकरिता कंपनी प्रशासनाला विनंती देखील केली.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top