Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author We publish the news of Vidarbha level prominently on our website. If you are interested in doing digital journalism then you can join us. We also work for our advertisers to reach their advertisements to thousands of readers every day. any suggestion please message this mobile number 9975977378 email - samarthbharat3@gmail.com
Title: नाना पटोलेंच्या गृहजिल्ह्यात काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कट्टर समर्थकाने केला भाजपात प्रवेश आमचा विदर्भ - ब्युरो रि...
  • केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कट्टर समर्थकाने केला भाजपात प्रवेश
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
भंडारा -
संघटन बांधणीसाठी संपूर्ण राज्यात फिरत असलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गृहजिल्ह्यातील समर्थकांमध्ये नाराजी असल्याचे दिसून येत आहे. पटोलेंचे कट्टर समर्थक समजले जाणारे सूर्यकांत इलमे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. इलमे यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसमधील, विशेषत: पटोलेंच्या समर्थकांमधील अंतर्गत नाराजी आता बाहेर येऊ लागली आहे. ही नाराजी दूर करण्याचे आव्हान पटोलेंसमोर आहे.

भंडारा नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमधून नगरसेवक झालेले सूर्यकांत इलमे पुढे पालिकेचे उपाध्यक्ष झाले. त्यानंतर ते नाना पटोले यांच्यासोबत भाजपात गेले. इलमे यांचे संघटन कौशल्य उत्तम असल्याने त्यांनी बऱ्यापैकी भाजप कार्यकर्त्यांची फळी उभी केली होती. २०१६ मध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीत डॉ. परिणय फुके यांच्या विजयात पटोलेंसोबतच इलमे यांची भूमिका मोठी होती. तेव्हापासूनच इलमे यांची फुके यांच्यासोबत जवळीक वाढली. परंतु, नंतरच्या काळात पटोले यांचे भाजपात वजन असतानाही इलमे यांची नगराध्यक्ष पदाची उमेदवारी कापण्यात आली. तरीसुद्धा इलमे हे पटोले समर्थक म्हणून काम करीत होते. दरम्यान, भाजप सोडल्यानंतर ते काणत्याही पक्षात नव्हते. २०१९ मध्ये नाना पटोले विधानसभेचे अध्यक्ष झाले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बनले. परंतु, मुंबईत गेल्यानंतरही समर्थक हिरमुसल्या चेहऱ्यांनी परत येत होते. त्यांची कामे होत नव्हती. आपल्याला टाळल्या जात असल्याचा सूर अनेक समर्थकांमध्ये उमटत होता. नागपूर आणि मोरगाव अर्जुनीतील कंपू पटोलेंजवळ जाण्यापासून रोखत होता, असा अनुभव अनेक समर्थकांचा आहे. इतके वर्ष काम केल्यानंतरही कामे होत नसल्याने अखेर त्यांचे खंदे समर्थक सूर्यकांत इलमे यांनी भाजपमध्ये वापसी केली.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top