Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: दोन शाळकरी मुलांचा शेततळ्यात पोहताना बुडून मृत्यू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शेततळ्यातील गाळामुळे दोघेही चिखलात रुतले कुटुंबियांनी केला मोठा आक्रोश रक्षक पाटील - आमचा विदर्भ प्रतिनिधी यवतमाळ - शेतात खत टाकण्यासाठी गेल...
  • शेततळ्यातील गाळामुळे दोघेही चिखलात रुतले
  • कुटुंबियांनी केला मोठा आक्रोश
रक्षक पाटील - आमचा विदर्भ प्रतिनिधी
यवतमाळ -
शेतात खत टाकण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा शेततळ्यात पोहताना बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना मंगळवारी २० जुलै रोजी दुपारी यवतमाळमधील नांदुरा खुर्द येथे घडली. आकाश राजेंद्र दुतकोर वय १५, रा. नांदुरा खुर्द आणि चेतन सुरेश मसराम वय १५, रा. नांदुरा अशी मृत्यू झालेल्या दोन विद्यार्थ्यांची नावे आहेत.
नांदुरा खुर्द शेतशिवारातील एका शेतात पिकाला खत टाकण्यासाठी ही शाळकरी मुले गेली होती. काम संपवून घरी परत येत असताना त्यांना पाण्याने भरलेल्या शेततळ्यात पोहण्याचा मोह झाला. त्यानंतर दोघांनी शेततळ्यात सरळ उडी घेतली.
शेततळ्यात साचलेला गाळ मोठ्या प्रमाणात असल्याने ते दोघेही चिखलात रुतून बसले. उडी घेतलेली दोन्ही मुले पाण्याच्या बाहेर न आल्याने त्यांच्यासोबत असलेल्या इतर मुलांनी या घटनेची माहिती नांदुरा खुर्द येथील ग्रामस्थांना दिली.
ग्रामस्थांनी घटनास्थळावर धाव घेत शेततळ्यातून मुलांना बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत त्या दोघांचाही मृत्यू झाला.




About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top