आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडाच्यावतीने २०१४ व २०१७ या कालावधीत आदिवासी विद्यार्थ्यांना वाहनचालकाचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यांच्या प्रशिक्षणानंतर अनेक वर्षे गेली. मात्र त्यांची दखल परिवहन महामंडळाने घेतली नाही. त्यानंतर या सर्व प्रशिक्षण घेतलेल्या युवकांची बस चालविण्याची चाचणी परीक्षा घेण्यात आली. यात १८० आदिवासी युवक उत्तीर्ण झाले. या विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी झाल्यावर १४ जानेवारी रोजी या युवकांची निवड राज्य परिवहन महामंडळाने वाहनचालक म्हणून केली. अत्यंत गरीब दुर्गम भागातील आदिवासी मुलांची निवड झाल्याने या युवकांच्या आईवडिलांनाही आनंद झाला. मात्र गेले सात महिने परिवहन महामंडळात रुजू होण्याची वाट पाहत असलेल्या युवकांना आदेशच मिळाले नाही. त्यामुळे नैराश्याने ग्रासलेल्या या आदिवासी युवकांनी आत्महत्या करण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितली आहे.
जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणात आठ दिवसांत अहवाल मागवून कोणत्याही युवकावर अन्याय होणार नाही, असे आश्वासन दिले आहेत.
बातम्या अधिक आहेत......
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.