Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: १८० आदिवासींनी मागितली आत्महत्येची परवानगी; 'हे' आहे कारण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
रक्षक पाटील - आमचा विदर्भ प्रतिनिधी यवतमाळ - राज्य परिवहन महामंडळातर्फे चालकपदासाठी सात महिन्यांपूर्वीच सर्व प्रक्रिया पूर्ण होऊनही रूजू होण...

रक्षक पाटील - आमचा विदर्भ प्रतिनिधी
यवतमाळ -
राज्य परिवहन महामंडळातर्फे चालकपदासाठी सात महिन्यांपूर्वीच सर्व प्रक्रिया पूर्ण होऊनही रूजू होण्याचे आदेश देण्यात आले नाही. सरकारच्या या दिरंगाईला कंटाळून १८० आदिवासी युवकांनी आत्महत्येची परवानगी मागितली. रिपाइंचे जिल्हाध्यक्ष मिलिंद मानकर यांच्या नेतृत्त्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. एमपीएससीची पूर्व, मुख्य परीक्षा पास झाल्यानंतर मुलाखतीसाठी दीड वर्षांत बोलविण्यात न आल्याने स्वप्नील लोणकर या युवकाने आत्महत्या केली. त्यावरून राज्यात वाद वाढला असतानाच एसटी महामंडळाची दिरंगाईही यानिमित्ताने पुढे आली आहे.

आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडाच्यावतीने २०१४ व २०१७ या कालावधीत आदिवासी विद्यार्थ्यांना वाहनचालकाचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यांच्या प्रशिक्षणानंतर अनेक वर्षे गेली. मात्र त्यांची दखल परिवहन महामंडळाने घेतली नाही. त्यानंतर या सर्व प्रशिक्षण घेतलेल्या युवकांची बस चालविण्याची चाचणी परीक्षा घेण्यात आली. यात १८० आदिवासी युवक उत्तीर्ण झाले. या विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी झाल्यावर १४ जानेवारी रोजी या युवकांची निवड राज्य परिवहन महामंडळाने वाहनचालक म्हणून केली. अत्यंत गरीब दुर्गम भागातील आदिवासी मुलांची निवड झाल्याने या युवकांच्या आईवडिलांनाही आनंद झाला. मात्र गेले सात महिने परिवहन महामंडळात रुजू होण्याची वाट पाहत असलेल्या युवकांना आदेशच मिळाले नाही. त्यामुळे नैराश्याने ग्रासलेल्या या आदिवासी युवकांनी आत्महत्या करण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितली आहे.

जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणात आठ दिवसांत अहवाल मागवून कोणत्याही युवकावर अन्याय होणार नाही, असे आश्वासन दिले आहेत.

बातम्या अधिक आहेत......

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top