Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: आदेशांकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करा - पवन ढवळे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कंपनी व्यवस्थापनांच्या अनुपस्थितीवर भारतीय मजदूर संघाचा संताप आमचा विदर्भ - दीपक शर्मा चंद्रपूर (दि. ०५ डिसेंबर २०२५) –         औद्योगिकदृष्...
कंपनी व्यवस्थापनांच्या अनुपस्थितीवर भारतीय मजदूर संघाचा संताप
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. ०५ डिसेंबर २०२५) –
        औद्योगिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यात कामगारांच्या हक्कांवरून कंपनी प्रशासन आणि कामगार संघटनांमध्ये वाढत्या तणावाला नवीन वळण मिळाले आहे. भारतीय मजदूर संघाचे जिल्हा मंत्री पवन ढवळे यांनी कंपनी व्यवस्थापनांना तीव्र शब्दांत इशारा देत कामगार आयुक्तांच्या आदेशाला दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनावर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

         डॉ. बाबासाहेब आंबेडकर कामगार भवनात झालेल्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पवन ढवळे म्हणाले की, चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा म्हणून महाराष्ट्रात ओळखला जातो. त्यामुळे कामगारांचे प्रश्न, त्यांचे हक्क आणि न्याय मिळवून देण्याची जबाबदारी प्रशासनावर तसेच कंपनी व्यवस्थापनावर तितकीच आहे. मात्र अनेक वेळा कामगार आयुक्तांनी बोलावलेल्या संयुक्त बैठकींना कंपनी व्यवस्थापन मुद्दाम अनुपस्थित राहते, ज्यामुळे कामगार आयुक्तांचा तसेच कामगार वर्गाचा अपमान होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की, आयुक्तांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करणे, बैठकीला न येणे आणि मुद्दाम विलंब करवून कामगारांच्या न्याय प्रक्रियेत अडथळा निर्माण करणे हे गंभीर आहे. या वर्तनामुळे कामगारांमध्ये तीव्र असंतोष वाढत आहे आणि त्यांच्या न्याय मिळवण्याच्या प्रक्रियेत जाणूनबुजून अडथळा निर्माण केला जात आहे.

        पवन ढवळे यांनी इशारा दिला की, जर पुढील काळातही कंपनी व्यवस्थापनांनी अशाच प्रकारे बैठकींना गैरहजर राहणे, आदेश पाळण्यात निष्काळजी वृत्ती ठेवणे सुरूच ठेवले तर भारतीय मजदूर संघ चंद्रपूर जिल्हा शाखा मोठ्या आंदोलनाची भूमिका घेणार आहे. कामगारांच्या प्रश्नांवर सतत अडथळा आणणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई न झाल्यास कामगारांना रस्त्यावर उतरावे लागेल, अशीही चेतावणी त्यांनी दिली.

#LabourRights #WorkersJustice #TradeUnionVoice #ChandrapurIndustry #BMSEfforts #WorkersUnity #FightForJustice #CorporateAccountability #LabourCommissioner #IndustrialNews #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top