Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: हिरवी फांदी तुटली…पक्ष्यांच्या किलबिलाटावर कुऱ्हाड
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मॉर्निंग वॉकमध्ये उघडकीस आले निसर्गाचे विनाशचित्र आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. ०९ डिसेंबर २०२५) -         देशपांडे वाडी मागील वाहणाऱ...
मॉर्निंग वॉकमध्ये उघडकीस आले निसर्गाचे विनाशचित्र
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. ०९ डिसेंबर २०२५) -
        देशपांडे वाडी मागील वाहणाऱ्या नाल्यालगत असलेल्या हिरव्यागार झाडांची अनधिकृत कत्तल सुरू असून या घटनेमुळे परिसरातील नागरिक आणि पर्यावरणप्रेमी मोठ्या प्रमाणात संतप्त झाले आहेत. देशपांडे वाडी आणि लक्ष्मीनगर येथील नागरिक मॉर्निंग वॉकला जात असताना त्यांना नाल्याच्या काठावरील मोठ्या झाडांच्या तुटलेल्या फांद्या, पडलेली पाने आणि झाडांची अचानक कमी झालेली संख्या याचे स्पष्ट पुरावे दिसले.

         नाल्याच्या कडेला अनेक वर्षे उभ्या असलेल्या या हिरव्या झाडांवर विविध पक्ष्यांचा किलबिलाट असायचा. हा परिसर पक्ष्यांच्या मधुर आवाजाने नेहमीच जिवंत असायचा. मात्र गेल्या काही दिवसांत झाडांची संख्या झपाट्याने कमी झाल्याने, या परिसराचा नैसर्गिक आनंद आणि पक्षीजीवनाची लगबग थांबणार तर नाही ना, अशी गंभीर चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

        सध्या गुलाबी थंडी वाढलेली आहे आणि त्यातच गॅस सिलेंडरचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने गरम पाण्यासाठी किंवा घरगुती इंधन म्हणून काही व्यक्ती झाडांची कत्तल करीत असावेत, असा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन हे कृत्य केले जात असल्याचीही चर्चा आहे.

        पर्यावरणाचा समतोल बिघडवणारी ही कृती केवळ कायद्याचे उल्लंघन नाही तर निसर्गासाठीही मोठा धोका असल्याचे पर्यावरणप्रेमी सांगतात. परिसरातील हिरवाई नष्ट झाल्यास नाल्याच्या कडेला मृदक्षरण वाढण्याची, तापमान वाढण्याची आणि पक्ष्यांचे आश्रयस्थान नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

        नागरिकांनी वन विभागाने संज्ञान घेत तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. हिरवाईचे विनाशकारक खांदे रोखावेत, झाडे कापणाऱ्यांना ओळखून कठोर शिक्षा करावी, तसेच नाल्यालगतचा परिसर संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करावा, याकरिता पर्यावरण प्रेमीं संस्था आणि नागरिकांनीही पुढाकार घ्यावा अशीही मागणी समोर आली आहे.

#SaveTrees #StopTreeCutting #ProtectNature #GreenUnderThreat #EnvironmentAlert #SaveBirdHabitat #RajuraUpdates #ForestDeptAction #EcoCrisis #NatureMatters #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top