Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: राजुरा-अमृतगडा मार्गावरील रस्त्यांची भयावह अवस्था
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राजुरा-अमृतगडा मार्गावरील रस्त्यांची भयावह अवस्था नागरिक त्रस्त, अपघातांचा धोका वाढला आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. १२ जुलै २०२५) –  ...
राजुरा-अमृतगडा मार्गावरील रस्त्यांची भयावह अवस्था
नागरिक त्रस्त, अपघातांचा धोका वाढला
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. १२ जुलै २०२५) –
        राजुरा तालुक्यातील राजुरा ते अमृतगडा मार्गावरील आर्वी फाटा – कविटपेठ – चिंचोली दरम्यानच्या रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय व चिंताजनक झाली आहे. जवळपास 7-8 महिन्यांपासून रस्त्यावरील खड्डे भरून काढण्याचे व दुरुस्तीचे काम प्रलंबित असल्यामुळे पावसाळ्यात रस्त्यांची स्थिती अधिकच बिकट झाली आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी खोल व विस्तीर्ण खड्डे पडले असून काही ठिकाणी तर इतकी खोलगट जागा झाली आहे की, मोठ्या वाहनांचा तोल जाऊन अपघात होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. दोन चाकी वाहनांसाठी तर हा रस्ता अतिशय धोकादायक बनला असून, विशेषतः रात्रीच्या वेळी वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
        या संदर्भात चिंचोली बु. येथील सामाजिक कार्यकर्ते देविदास देठे यांनी आपल्या पत्रकार ग्रुपमार्फत संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून दिले असून, तात्काळ रस्त्यांची डागडुजी करण्याची मागणी केली आहे. या मार्गावर दररोज शाळकरी मुले, कामगार, रुग्ण आणि सामान्य नागरिक प्रवास करतात. त्यामुळे रस्त्यांची ही अवस्था जनतेसाठी जीवघेणी ठरत आहे. प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून या रस्त्याचे काम मार्गी लावावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top