Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: छत्रपती शिवाजी महाराजांच्या 'चेतना यात्रेचा' पुण्यातून शुभारंभ
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 'चेतना यात्रेचा' पुण्यातून शुभारंभ देशभर भ्रमंती करून रायगड येथे समारोप; पत्रकार परिषदेत जनार्दन पाटील य...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 'चेतना यात्रेचा' पुण्यातून शुभारंभ
देशभर भ्रमंती करून रायगड येथे समारोप; पत्रकार परिषदेत जनार्दन पाटील यांची माहिती
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. ०५ जुलै २०२५) -
        महाराष्ट्राच्या इतिहासाला दिशा देण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रचार-प्रसार देशभर करण्याच्या उद्देशाने पुणे येथून 'चेतना यात्रेचा' भव्य शुभारंभ करण्यात येणार आहे. या यात्रेची सुरुवात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते होणार असून यासंदर्भातील माहिती जनार्दन पाटील यांनी ५ जुलै रोजी स्थानिक श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

        जनार्धन पाटील यांनी सांगितले की, छत्रपती शिवरायांचा इतिहास सुमारे ३५० वर्षांपूर्वीचा असूनही दिल्लीसारख्या देशाच्या राजधानीत त्यांच्या नावाने कोणतेही स्थायी कार्यालय नसणे ही शोकांतिका आहे. संपूर्ण भारताला शिवाजी महाराजांचा संघर्ष, न्याय, नीती आणि आदर्श माहित व्हावा, यासाठी ही चेतना यात्रा काढली जात आहे. या यात्रेमध्ये पुणे, आंध्रप्रदेश, तेलंगणा, ओडिशा, झारखंड, उत्तरप्रदेश, बिहार, पंजाब, हरियाणा, दिल्ली, जयपूर, गुजरात अशा विविध राज्यांचा समावेश असेल. यात्रेचा समारोप रायगड किल्ल्यावर होणार आहे.

        यात्रेदरम्यान ग्रामीण भागात विशेष प्रगती करणाऱ्या व्यक्तींचा ‘शिवशौर्य’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार असल्याचेही जनार्धन पाटील यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस अखिल भारतीय कुणबी महासंघाचे डि. के. आरीकर, महिला जिल्हाध्यक्ष विद्या चित्ताडे, जिल्हाध्यक्ष अतुल ठाकरे, संशिप्ता शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top