Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: विठ्ठलनामाच्या गजरात चंद्रपूर ते वढा वारीचा मंगल प्रवास
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
विठ्ठलनामाच्या गजरात चंद्रपूर ते वढा वारीचा मंगल प्रवास आ. सुधीर मुनगंटीवार मित्रपरिवारातर्फे भक्तिमय स्वागत डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या नेतृत...
विठ्ठलनामाच्या गजरात चंद्रपूर ते वढा वारीचा मंगल प्रवास
आ. सुधीर मुनगंटीवार मित्रपरिवारातर्फे भक्तिमय स्वागत
डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या नेतृत्वात उत्साही आयोजन
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
चंद्रपूर (दि. ०५ जुलै २०२५) -
        आषाढी एकादशीच्या निमित्ताने चंद्रपूर जिल्ह्यातील श्रद्धास्थान तीर्थक्षेत्र वडा येथील विठ्ठल-रुक्माई मंदिराकडे पारंपरिक पायदळ वारीचे भव्य आयोजन करण्यात आले. या वारीची सुरुवात चंद्रपूर येथील महाकाली मंदिरापासून झाली. या भक्तिमय वारीचे सद्भावपूर्ण स्वागत आदरणीय आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली, डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या नेतृत्वात अत्यंत उत्साही वातावरणात करण्यात आले. वारीच्या स्वागतासाठी प्रकाश धारणे, किरण बुटले, नम्रता आचार्य ठेमसकर, उमेश आष्टनकर, सचिन कोतपल्लीवार, रवी लोणकर, सोहम बुटले, अमित निरंजने, प्रवीण उरकुडे तसेच डॉ. सुधीर मुनगंटीवार मित्रपरिवाराचे असंख्य सदस्य सहभागी झाले होते. वारीचे नेतृत्व संत श्री चैतन्य महाराज करत होते. या वारीस शंकर वरारकर, सरपंच किरण बांदुरकर, तनुश्री बांदुरकर, बाळकृष्ण झाडे, शंकर वासेकर यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.

        वारीदरम्यान "पांडुरंग विठ्ठल"च्या जयघोषात आणि टाळ-मृदंगाच्या निनादात शहर भक्तिमय झाले. जटपुरा गेट येथे रिंगण घालण्यात आले आणि घोड्याच्या शानदार तालमींनी वातावरण भारावून गेले. सर्व वारकऱ्यांसाठी अल्पोपहाराची व पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. संपूर्ण वारीदरम्यान आ. सुधीर मुनगंटीवार मित्रपरिवारातर्फे वारकऱ्यांचे प्रेमपूर्वक स्वागत झाले. भक्ती, सामाजिक एकता आणि श्रद्धेच्या संगमात ही पवित्र वारी तीर्थक्षेत्र वढा येथे प्रस्थान करून आषाढी एकादशीचे औचित्य अधिक मंगलमय बनवून गेली.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top