Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: Agriculture Day पर्यावरण समतोलासाठी बांबू लागवड गरजेची – सय्यद आबिद अली
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
Agriculture Day पर्यावरण समतोलासाठी बांबू लागवड गरजेची – सय्यद आबिद अली वसंतराव नाईक यांच्या कार्याचा गौरव करत कृषी दिन साजरा कोरपना पंचायत ...
Agriculture Day पर्यावरण समतोलासाठी बांबू लागवड गरजेची – सय्यद आबिद अली
वसंतराव नाईक यांच्या कार्याचा गौरव करत कृषी दिन साजरा
कोरपना पंचायत समितीमध्ये कृषी दिन साजरा; हवामान आधारीत शेती आणि बांबू लागवडीचा संकल्प
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
कोरपना (दि. ०१ जुलै २०२५) –
         महाराष्ट्र राज्याचे भूतपूर्व मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिनाचे औचित्य साधून स्थानिक पंचायत समिती यांच्या वतीने समितीच्या सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

        कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी विजय पेंदाम हे होते. आपल्या भाषणात त्यांनी हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर आधारित नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले. त्यांनी शेतीत प्रयोगशीलता व अर्थकारणाचा विचार करून ‘बांबू लागवडीसारख्या’ पर्यायांचा अंगीकार करण्याचे आवाहन करत तालुक्यात बांबू लागवडीची चळवळ उभारण्याचा संकल्प या दिवशी करण्यात आल्याचे सांगितले. कार्यक्रमात तालुका कृषी अधिकारी गोविंद ठाकूर यांनी वसंतराव नाईक यांच्या कृषी क्षेत्रातील योगदानावर प्रकाश टाकत, बदलत्या काळात शाश्वत शेती आणि नव्या तंत्रज्ञानाची गरज अधोरेखित केली.

        सामाजिक कार्यकर्ते सय्यद आबिद अली यांनी 1970–72 मधील भीषण दुष्काळाचे वास्तव सांगत, त्या काळात वसंतराव नाईक यांनी हरितक्रांती घडवून आणल्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी वाढत्या तापमान, प्रदूषण, आणि जंगल क्षेत्राच्या ऱ्हासामुळे पर्यावरणाच्या समतोलावर होणाऱ्या परिणामांबाबत चिंता व्यक्त केली. कार्यक्रमात सहाय्यक गटविकास अधिकारी होळकर, कृषी अधिकारी दूधे, ग्रामसेवक, पंचायत समितीचे अधिकारी-कर्मचारी, महिला संघाच्या कार्यकर्त्या, सदन शेतकरी, ग्राम रोजगार सेवक तसेच कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार विस्तार अधिकारी गाडगे यांनी मानले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top