Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: राजुरा तालुक्यातील पाण्याचा ठणठणाट
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राजुरा तालुक्यात पाण्याचा ठणठणाट शेकडो बंधारे कोरडे, जनावरांची पाण्यासाठी भटकंती आमचा विदर्भ - अनंता गोखरे राजुरा (दि. 16 एप्रिल 2025) -    ...
राजुरा तालुक्यात पाण्याचा ठणठणाट
शेकडो बंधारे कोरडे, जनावरांची पाण्यासाठी भटकंती
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. 16 एप्रिल 2025) -
        यंदा उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच तापमानाने उच्चांक गाठला असून, राजुरा तालुक्यातील अनेक नदी, नाले, तलाव आणि शेकडो बंधारे कोरडे पडले आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांसमोर तीव्र पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. राजुरा तालुक्यातील वेकोलीच्या बल्लारपूर क्षेत्रातील गोवरी, सास्ती, पोवनी, गोवरी डीप, धोपटाळा परिसरात मोठ्या प्रमाणात खुल्या कोळसा खाणी असून, या खाणी ३०० ते ४०० फूट खोल असल्यामुळे भूगर्भातील जलपातळी दिवसेंदिवस खालावत आहे. यावर्षी बारमाही वाहणाऱ्या नद्यांमध्येही जलसाठा अत्यल्प राहिल्याने वर्धा नदीचे अर्ध्याहून अधिक पात्र कोरडे पडले आहे. त्याचा थेट फटका नदीकाठच्या गावांना बसत असून, शेतकरी, नागरिक आणि विशेषतः जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर बनत आहे.

        दरवर्षीप्रमाणे यंदाही वेकोली परिसरातील तलाव, नाले आणि बंधारे वेळेआधीच कोरडे पडले असून, पाण्याची पातळी इतकी खाली गेली आहे की अनेक ठिकाणी विहिरी व हँडपंप कोरडे पडले आहेत. त्यामुळे जनावरांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली असून, नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने तातडीने टँकरने पाणीपुरवठा सुरू करावा, तसेच दीर्घकालीन उपाययोजना राबवून पाणी व्यवस्थापनावर भर द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top