Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: ‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणांनी आसमंत दुमदुमला
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणांनी आसमंत दुमदुमला विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या नेतृत्वाखाली प्रचंड निषेध आंदोलन आमचा विदर्भ - राजेश अरो...
‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणांनी आसमंत दुमदुमला
विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या नेतृत्वाखाली प्रचंड निषेध आंदोलन
आमचा विदर्भ - राजेश अरोरा
बल्लारपूर (दि. २६ एप्रिल २०२५) -
        आज बल्लारपूर येथे विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, सकल हिंदू समाज आणि व्यापारी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने काश्मीरमधील पहलगाम येथे धर्माच्या नावाखाली झालेल्या भयानक नरसंहार आणि हत्यांच्या निषेधार्थ भव्य विरोध प्रदर्शन व श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले.

        या कार्यक्रमात विभाग संयोजक विकास मंजरे, जिल्हा मंत्री सत्यनारायण खेंगर, तालुका अध्यक्ष जीतेश पोपली, शहर अध्यक्ष कैलाश जोरा, तालुका मंत्री राजकुमार निषाद, प्रखंड संयोजक शुभम निषाद, सहसंयोजक सतीश चुनियाने तसेच मनोहर सिंह चावला, उदय वर्मा, आकाश अलट, धन्नजय पाल, काशीनाथ सिंह, गुलशन शर्मा, रिंकू गुप्ता, अरविंद वर्मा, नवीन बनोत, गोलू पवार, श्रेयांश ठाकुर, करण निषाद, राजू मूंधड़ा, जगदीश मूंधड़ा, चेतन गहेरवार, रामेश्वर पासवान, योगेश साखरकर, राजेश कैथवास, बॉबी पाल, श्रीकांत उपाध्याय, अनिकेत दुबे आणि अनेक मान्यवर नागरिक उपस्थित होते.

       सर्व उपस्थितांनी हुतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आणि आतंकवाद तसेच त्याच्या समर्थकांविरुद्ध तीव्र रोष व्यक्त केला. वक्त्यांनी धर्माच्या नावाखाली करण्यात आलेल्या हिंसेचा तीव्र निषेध केला व मानवतेवर झालेल्या कलंकाची निंदा केली. त्यांनी भारताच्या अखंडतेच्या रक्षणासाठी व आतंकवादाच्या समूळ नाशासाठी सर्व हिंदू समाजाने एकत्र येण्याचे आवाहन केले. यावेळी बजरंग दलाचे "जात-पात की करो विदाई, हिंदू-हिंदू भाई-भाई" हे घोषवाक्य जोरदार घोषणांनी दिले गेले. तसेच "पाकिस्तान मुर्दाबाद, आतंकवाद मुर्दाबाद" असे जोरदार नारेही देण्यात आले. कार्यक्रमात उपस्थित नागरिकांनी एकमताने सरकारकडे दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या विरोध प्रदर्शनाने समाजातील सर्व घटकांचे एकत्रित आक्रोश दाखवून दिला की संपूर्ण देश आतंकवादाच्या विरोधात एकवटला आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top