Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: रेतीचोरीचा रस्ता बंद!
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
रेतीचोरीचा रस्ता बंद! तहसीलदारांची धडाकेबाज कारवाई माफियांना मोठा झटका file image आमचा विदर्भ - दीपक शर्मा चंद्रपूर (दिनांक 20 एप्रिल 2025) ...
रेतीचोरीचा रस्ता बंद!
तहसीलदारांची धडाकेबाज कारवाई
माफियांना मोठा झटका
file image
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दिनांक 20 एप्रिल 2025) -
        भद्रावती तालुक्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या अवैध रेती तस्करीवर अंकुश ठेवण्यासाठी महसूल विभागाने निर्णायक पावले उचलली आहेत. तालुक्याचे तहसीलदार राजेश भांडारकर यांच्या नेतृत्वाखाली मागील तीन महिन्यांत 27 वाहने जप्त करण्यात आली असून त्यापैकी 21 वाहन मालकांकडून तब्बल 27 लाख 13 हजार 700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. उर्वरित 6 वाहनधारकांवर दंड वसुलीची प्रक्रिया सुरु आहे. या कारवायांमध्ये हायवा ट्रक, ट्रॅक्टर यासारख्या अवजड वाहनांचा समावेश असून हे वाहनधारक रात्रीच्या वेळी गुप्त मार्गांनी पिपरी, गोनाड, कोंढा नाला, बिजोनी, पारोधी, उंबर घाट आणि इतर नाल्यांतून अवैध रेती वाहतूक करत होते. या अवजड वाहनांमुळे रस्त्यांची मोठी हानी झाली असून नागरिकांच्या रात्रीच्या विश्रांतीतही अडथळा निर्माण झाला होता. महसूल विभागाच्या कारवाईमुळे रेती तस्करीसाठी वापरले जाणारे आधुनिक तंत्रज्ञान निष्प्रभ ठरले आहे. या धडक कारवायांमुळे रेती माफियांमध्ये भीतीचं वातावरण पसरले असून नागरिकांमधून तहसीलदार भांडारकर यांचं कौतुक होत आहे. "अशा कडक कारवायांमुळेच प्रशासनावर विश्वास वाढतो," अशी प्रतिक्रिया जनतेतून उमटत आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top