"विजेच्या संकटावर मनसेचा प्रकाश''
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दिनांक 20 एप्रिल 2025) -
महाकाली कॉलरी परिसरातील प्रकाश नगर आणि कपिल चौक येथे वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याने स्थानिक नागरिक त्रस्त झाले होते. विजेच्या कमजोर आणि खाली लोंबकळणाऱ्या तारांमुळे जीवितहानीचीही शक्यता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर मनसेचे रुग्णमित्र कृष्णा गुप्ता, जिल्हा सचिव किशोर मडगुलवार आणि मनविसेचे जिल्हा उपाध्यक्ष कुलदिप चंदनखेडे यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या मुख्य अभियंत्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात, या भागातील नागरिक, विद्यार्थी, व्यापारी यांना होणाऱ्या त्रासाबद्दल चिंता व्यक्त केली गेली. विशेषतः घरांवरून गेलेल्या विजेच्या तारांमुळे लहान मुलं आणि वयोवृद्ध नागरिक धोक्याच्या छायेत होते.
निवेदनाचे गांभीर्य ओळखून महावितरणचे मुख्य अभियंता यांनी तात्काळ संबंधित कर्मचार्यांना महाकाली कॉलरी, प्रकाश नगर आणि परिसरातील वीज कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले. काही दिवसांतच काम पूर्ण करण्यात येणार असून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्याची मागणीही शिष्टमंडळाने ठेवली, जेणेकरून वारंवार होणारे वीज खंडित होणे थांबेल आणि जनजीवन सुरळीत राहील. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात मनसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदिप चंदनखेडे, रूग्ण मित्र क्रिष्णा गुप्ता, मनविसे तालुका उपाध्यक्ष प्रविण शेवते, शंकर भडके, प्रशांत रामटेके यांच्यासह अनेक मनसैनिक उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.