Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: विदर्भ राज्याच्या मागणीसाठी १ मे रोजी धरणे आंदोलन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
विदर्भ राज्याच्या मागणीसाठी १ मे रोजी धरणे आंदोलन अ‍ॅड. वामनराव चटप यांची पत्रकार परिषदेत माहिती आमचा विदर्भ - दीपक शर्मा  चंद्रपूर (दि. २७ ...
विदर्भ राज्याच्या मागणीसाठी १ मे रोजी धरणे आंदोलन
अ‍ॅड. वामनराव चटप यांची पत्रकार परिषदेत माहिती
आमचा विदर्भ - दीपक शर्मा 
चंद्रपूर (दि. २७ एप्रिल २०२५) -
        विदर्भातील ज्वलंत प्रश्न सोडवण्यासाठी आणि अपेक्षित विकास साध्य करण्यासाठी विदर्भाला स्वतंत्र राज्याचा दर्जा देणे अत्यावश्यक आहे, असे मत विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अ‍ॅड. वामनराव चटप यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. त्यांच्या माहितीनुसार, १ मे रोजी दुपारी १२ ते ४ दरम्यान चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या दिवशी "निषेध दिन" म्हणून काळे फिती लावून आंदोलन केले जाईल.

        अ‍ॅड. चटप म्हणाले, नागपूर करारानुसार विदर्भाला सिंचन, सार्वजनिक आरोग्य, उद्योग, ऊर्जा, ग्रामविकास यामध्ये जो विकास अपेक्षित होता तो अद्याप झाला नाही. ६० हजार कोटींचा सिंचन अनुशेष व १५ हजार कोटींचा अन्य विभागीय अनुशेष अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे १३१ धरणे अपूर्ण राहिली व १४ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊ शकली नाही. राज्याचा आर्थिक डोलारा कोलमडला असून, महाराष्ट्र सरकारकडे महसुलापेक्षा अधिक खर्च आहे. त्यामुळे विदर्भासोबत अन्याय होत आहे. वाढती बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, नक्षलवाद, प्रदूषण आणि कुपोषणासारख्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे विदर्भ राज्य निर्माण करणे ही काळाची गरज आहे. विदर्भातील प्रत्येक शेतकरी, शिक्षक, बेरोजगार, आणि विविध समाजघटकांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी किशोर दहेकर, कपिल इद्दे, अंकुश वाघमारे, मुन्ना आवळे, मुन्ना खोब्रागडे, मारोतराव बोथले, सुधीर सातपुते, अरुण सातपुते आदी उपस्थित होते. 

        तसेच, २५ मे रोजी अमरावती येथे अभियंता भवन येथे पश्चिम विदर्भ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, विदर्भवाद्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top