Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: पोलिस विभाग महिलांच्या पाठीशी, आत्मविश्वासाने पुढे या - एपीआय निशा भूते
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पोलिस विभाग महिलांच्या पाठीशी, आत्मविश्वासाने पुढे या - एपीआय निशा भूते "महात्मा फुले जयंतीनिमित्त महिलांना कायद्याचे ज्ञान आणि अन्याया...
पोलिस विभाग महिलांच्या पाठीशी, आत्मविश्वासाने पुढे या - एपीआय निशा भूते
"महात्मा फुले जयंतीनिमित्त महिलांना कायद्याचे ज्ञान आणि अन्यायाविरोधातील धाडसाची शिकवण!"
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. १४ एप्रिल २०२५) -
        महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंतीनिमित्त राजुरा भूषण महियार गुंडेविया अभ्यासिकेत "महिला विषयक कायदे" या विषयावर माहितीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी राजुरा पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक निशा गजानन भूते यांनी उपस्थित विद्यार्थिनींशी संवाद साधताना महिलांनी कोणताही अन्याय सहन न करता धाडसाने पुढे यावे, पोलीस विभाग नेहमीच त्यांच्या पाठीशी उभा आहे, असे ठामपणे सांगितले.

        एपीआय भूते यांनी आपल्या भाषणात समाजातील असहिष्णूता, महिलांवरील अन्याय व स्री शिक्षणाची गरज यावर सखोल प्रकाश टाकला. "महात्मा फुले यांनी पेटवलेली स्री शिक्षणाची ज्योत आता मशाल बनली असून, महिलांनी आत्मविश्वासाने आणि कायद्याच्या आधारे प्रत्येक क्षेत्रात आपले स्थान निर्माण करावे," असे त्या म्हणाल्या.

        कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. सारिका साबळे-जाधव होत्या. आपल्या भाषणात त्यांनी विद्यार्थिनींना आपले ध्येय निश्चित ठेवून सकारात्मक दृष्टीकोन बाळगून तंत्रज्ञानाचा योग्य वापर करावा, असे मार्गदर्शन केले. “सक्षम बना, शिक्षित बना आणि प्रगती साधा” असा संदेश त्यांनी विद्यार्थिनींना दिला.

        प्रमुख अतिथी म्हणून माजी सैनिकाच्या अर्धांगिनी निशा मोहुर्ले, सामाजिक कार्यकर्त्या संध्या बाळसराफ व निलीमा साळवे या व्यासपीठावर उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजुरा पत्रकार संघाचे सचिव अनिल बाळसराफ यांनी केले. संचालन अनुष्का बनसोड यांनी तर आभार प्रदर्शन रोशनी टेकाम यांनी केले. एपीआय निशा भूते व डॉ. सारिका साबळे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

        कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी व्यवस्थापिका शितल बनसोड, स्नेहा हंसकर, कृष्णाली बावणे, संजना वेलादी, वैष्णवी टेकाम, हर्षदा करमनकर यांनी विशेष परिश्रम घेतले. पायल कुंदलवार, जास्मीन शेख, प्रियंका धुर्वे, दिक्षा भोयर, लिना महानंद, इशिका लोखंडे, दुर्गा शेंडे, अमिषा मोरे यांच्यासह विद्यार्थिनींची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.



About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top