Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: पहलगाममधील रक्तरंजित घटनेनंतर बल्लारपूरात आक्रोशाचा सूर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पहलगाममधील रक्तरंजित घटनेनंतर बल्लारपूरात आक्रोशाचा सूर पाकिस्तानच्या विरोधात घोषणाबाजी आमचा विदर्भ - राजेश अरोरा / अनिल पांडेय बल्लारपुर (द...
पहलगाममधील रक्तरंजित घटनेनंतर बल्लारपूरात आक्रोशाचा सूर
पाकिस्तानच्या विरोधात घोषणाबाजी
आमचा विदर्भ - राजेश अरोरा / अनिल पांडेय
बल्लारपुर (दि. 25 एप्रिल 2025) -
        जम्मू-कश्मीरच्या पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या 28 निष्पाप पर्यटकांच्या निर्घृण हत्येच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. या अमानवी कृत्याचा निषेध करण्यासाठी बल्लारपूर शहरातील नगर परिषद चौकात भाजपकडून तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.

        या हल्ल्यात पाकिस्तानी अतिरेक्यांनी धर्म विचारून निष्पाप नागरिकांवर गोळ्या झाडल्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या डोळ्यासमोरच मृत्यू घडविला. याच पार्श्वभूमीवर 25 एप्रिल रोजी संध्याकाळी 6 वाजता, भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नवीन शहराध्यक्ष अ‍ॅड. रणंजय सिंह यांच्या नेतृत्वाखाली हे शांततापूर्ण आंदोलन झाले.

        या निदर्शना दरम्यान उपस्थित कार्यकर्त्यांनी "पाकिस्तान मुर्दाबाद" च्या घोषणा दिल्या. मृतांना श्रद्धांजली अर्पण करत 2 मिनिटांचे मौन पाळण्यात आले. यावेळी काशीनाथ सिंह, शिवचंद्र द्विवेदी, वैशाली जोशी, मनीष पांडे, बबलू गुप्ता, मोहित डांगोरे, अ‍ॅड. शाह, सचिन उमरे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. भाजपने या अमानुष घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवत केंद्र शासनाकडून कठोर कारवाईची मागणी केली आहे.



About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top