Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: आदिवासी कुटुंबाच्या जमिनीवर अतिक्रमणाचा प्रयत्न
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
attempted trespass आदिवासी कुटुंबाच्या जमिनीवर अतिक्रमणाचा प्रयत्न आदिवासी कुटुंबासाठी बंडू हजारे यांनी केला ''आवाज बुलंद'' ...
attempted trespass
आदिवासी कुटुंबाच्या जमिनीवर अतिक्रमणाचा प्रयत्न
आदिवासी कुटुंबासाठी बंडू हजारे यांनी केला ''आवाज बुलंद''
आमचा विदर्भ - दीपक शर्मा 
चंद्रपूर (दि. 10 एप्रिल 2025) -
        तुकुम विभाग क्रमांक 1 मधील स्टेट बँक कॉलनी येथे वडिलोपार्जित जमिनीत राहणाऱ्या पंचफुला मडावी कुळमेथे या आदिवासी कुटुंबावर अतिक्रमणाचा आणि धमक्यांचा गंभीर प्रकार समोर आला आहे. बल्लारपूर येथील काही व्यक्तींकडून या कुटुंबास त्यांच्या जमिनीतून आणि घरातून हाकलून देण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप करण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कुळमेथे कुटुंब या जमिनीत राहत आहे. मात्र, अभय सिंग कचवा, कमल सिंग कचवा, दिलीप वावरे, बादल खुशाल उराडे, तेजस दवे आणि मोना दवे या व्यक्तींनी पैशाच्या जोरावर धमक्या देऊन जमिनीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्व प्रकारामुळे कुटुंब भीतीच्या सावटाखाली जीवन जगत आहे.

या प्रकरणाची तक्रार स्थानिक पोलीस ठाण्यात देण्यात आली असली तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे या प्रकाराविरोधात शिवसेना (शिंदे गट) चे जिल्हाप्रमुख बंडू हजारे यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलिस प्रशासनाला कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, आदिवासी कुटुंबाच्या हक्काच्या जमिनीवर बळकावण्याचा प्रयत्न म्हणजे अन्याय असून, संबंधित व्यक्तींविरुद्ध कठोर गुन्हे दाखल करून कारवाई करावी. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top