Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: Kazipeth-Ballarshah Passenger कोरोना काळात बंद झालेली काजीपेठ-बल्लारशाह पॅसेंजर पुन्हा सुरू!
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
Kazipeth-Ballarshah Passenger कोरोना काळात बंद झालेली काजीपेठ-बल्लारशाह पॅसेंजर पुन्हा सुरू! राजुरा (दि. ०६ मार्च २०२५)         कोरोना महामा...
Kazipeth-Ballarshah Passenger
कोरोना काळात बंद झालेली काजीपेठ-बल्लारशाह पॅसेंजर पुन्हा सुरू!
राजुरा (दि. ०६ मार्च २०२५)
        कोरोना महामारीच्या काळात अनेक लोकल आणि पॅसेंजर रेल्वे सेवा बंद करण्यात आल्या होत्या, त्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र आता काजीपेठ-बल्लारशा-काजीपेठ ही पॅसेंजर (Kazipeth-Ballarshah Passenger) रेल्वे गाडी पुन्हा सुरू करण्यात आली आहे. (Railway) रेल्वे प्रवाश्यांची मागणी लक्षात घेत रेल्वे ने हि गाडी सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

        काजीपेठ बल्लारशा काजीपेठ ही रेल्वेगाडी रात्री १० वाजता काजीपेठ येथून सुटेल आणि पहाटे ३ वाजता बल्लारशा रेल्वे स्थानकावर पोहोचेल. या गाडीला १५ थांबे असून गाडीचा क्रमांक १७०३५ असा राहणार आहे. यासोबतच बल्लारशा स्थानकावरून परत काजीपेठकडे वापस जाणारी गाडी पहाटे ४ वाजता सुटून रात्री ९ वाजता काजीपेठ रेल्वे स्थानकावर पोहोचेल आणि या गाडीचा क्रमांक १७०३६ असा राहणार आहे, अशी माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे. 

          महाराष्ट्र आणि तेलंगणामधील प्रवाशांसाठी ही सेवा खूपच महत्त्वाची ठरेल, विशेषतः कामगार, विद्यार्थी आणि रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी. रेल्वे विभागाने घेतलेला हा निर्णय लोकांच्या मागणीला प्रतिसाद देणारा आहे. (Maharashtra Telangana Passengers)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top