Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: "स्मार्ट व्हिलेज स्पर्धेतील गाव, पण पाण्यासाठी इकडे तिकडे धाव!"
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
"स्मार्ट व्हिलेज स्पर्धेतील गाव, पण पाण्यासाठी इकडे तिकडे धाव!" आमचा विदर्भ - अनंता गोखरे चंद्रपूर (दि. ३१ मार्च २०२५) -         स...
"स्मार्ट व्हिलेज स्पर्धेतील गाव, पण पाण्यासाठी इकडे तिकडे धाव!"
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
चंद्रपूर (दि. ३१ मार्च २०२५) -
        स्मार्ट व्हिलेज स्पर्धेत सहभागी असलेल्या कळमना (वा.) गावाची गट ग्रामपंचायत असलेले निंबाळा हे गाव अद्यापही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. विशेषतः उन्हाळा सुरू होताच येथे भीषण पाणीटंचाई निर्माण होते. निंबाळा हे राजुरा तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेले गाव आहे. उन्हाळ्यात गावातील बोअरवेल आणि विहिरी कोरड्या पडतात, परिणामी नळयोजना एक दिवस आड सुरू ठेवली जाते. मात्र, पाईपलाइन फुटल्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून नळ योजना ठप्प आहे.

कर्मचाऱ्यांचे वेतन थांबले, नवीन नियुक्तीवर गावकऱ्यांचा आक्षेप
        गावकऱ्यांच्या आरोपानुसार, पाणीपुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन अनेक महिन्यांपासून थांबले आहे, त्यामुळे त्यांनी आपले काम बंद केले आहे. यावर उपाय न करता ग्रामपंचायतीने कळमना येथील अनुभव नसलेल्या नवीन कर्मचाऱ्याची नेमणूक केली, यामुळे परिस्थिती अधिकच बिघडली आहे.

पिण्याच्या पाण्यासाठी शेतावर धाव!
        पाण्याची तीव्र टंचाई असल्यामुळे गावकऱ्यांना शेतातून पाणी आणण्याची वेळ आली आहे. अगदी कपडे धुण्यासाठीही बोअरवेल असलेल्या शेतांपर्यंत जावे लागत आहे. ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रार करूनही या समस्येकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.

ग्रामपंचायतीकडून दुर्लक्ष, ग्रामस्थ संतप्त
         ग्रामपंचायतीच्या निष्क्रियतेमुळे गावकरी संतप्त असून, त्वरित नळयोजना सुरू करावी, कर्मचाऱ्यांचे वेतन द्यावे आणि नवीन कर्मचाऱ्यांची नेमणूक तात्पुरती थांबवावी, अशी मागणी होत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष न दिल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top