Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: Youth drowned in Wardha river वर्धा नदीवर आंघोळीला गेलेले तिन तरूण पाण्यात बुडाले
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
Youth drowned in Wardha river वर्धा नदीवर आंघोळीला गेलेले तिन तरूण पाण्यात बुडाले बोटींद्वारे शोध सुरू -  राजुरा तालुक्यातील घटना आमचा विदर्...
Youth drowned in Wardha river
वर्धा नदीवर आंघोळीला गेलेले तिन तरूण पाण्यात बुडाले
बोटींद्वारे शोध सुरू - राजुरा तालुक्यातील घटना
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुुरा (दि. २६ फेब्रुवारी २०२५) -
        राजुरा तालुक्यातील चुनाळा गावातील तिन युवक महाशिवरात्री निमीत्त आंघोळ करण्यासाठी वर्धा नदीवरील चुनाळा घाट भागात गेले होते. यावेळी आंघोळीसाठी नदीपात्रात उतरलेल्या या तरूणांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले. आज दिनांक 26 फेब्रुवारी ला दुपारी 12-30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे चुनाळा गावात शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच राजुरा पोलिस तातडीने घटनास्थळी आले आणि त्यांनी बेपत्ता युवकांचा शोध सुरू केला. चंद्रपूर येथून बोट बोलविण्यात आली असून शोध सुरू आहे. स्थानिक मच्छीमारांच्या बोटीही शोध घेत आहेत. या घटनेतील युवक राजुरा क्षेत्रातील असले तरी घटनास्थळ बल्लारपूर पोलिस ठाणे अंतर्गत येत असल्याने बल्लारपूर पोलिस शोध घेत आहेत. सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत बेपत्ता युवकांचा शोध लागला नसल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत पवार यांनी सांगितले.


        या घटनेतील दुर्देवी तरूणांची नावे मंगेश बंडू चणकापुरे, वय 20, अनिकेत शंकर कोडापे, वय 18 आणि तुषार शालिक आत्राम, वय 17 अशी आहेत. हे सर्व युवक चुनाळा येथील रहिवासी आहेत. हे युवक येतांना काहींनी या भागात डोह असल्याने न जाण्याविषयी सांगितले, मात्र त्यांनी मानले नाही. मिळालेल्या माहितीनुसार सर्वप्रथम एका महिलेने या युवकांना पाण्यात बुडत असल्याचे बघून आरडओरडा केला. तेव्हा शिवारातील शेतकरी धावून आले, मात्र तोपर्यंत हे तिन्ही युवक नदीच्या पाण्यात दिसेनासे झाले होते. यावेळी रामचंद्र रागी नामक शेतकऱ्याने गावकऱ्यांना माहिती दिली. दरम्यान पोलिस व तहसिल कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापनाचे कर्मचारी घटनास्थळी असून चंद्रपूर येथून आलेल्या बोटीद्वारे व स्थानिक मच्छीमारांच्या बोटीद्वारे बेपत्ता युवकांचा शोध सुरू आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top