Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: जंगलात जाणे प्रेमीयुगलाला पडले महागात
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
चंद्रपूर ( दि. १६ जानेवारी २०२४ ) –        तरुणाई प्रेम भावनांनी भरलेले असते. एकमेकांना भेटण्यासाठी ते अनेक सीमा ओलांडतात. त्याचे परिण...

चंद्रपूर (दि. १६ जानेवारी २०२४) –
       तरुणाई प्रेम भावनांनी भरलेले असते. एकमेकांना भेटण्यासाठी ते अनेक सीमा ओलांडतात. त्याचे परिणामही भोगावे लागतात. असाच प्रकार एका प्रेमी युगुलाच्या बाबतीत घडला. एकांत शोधण्यासाठी वाघाचा मुक्त संचार असलेल्या भागात पोहोचणे प्रेमात असलेल्या जोडप्यासाठी अडचणीचे ठरले आहे. वनविभागाने या प्रेमी युगुलावर ट्रेस पासचा गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा प्रथमच नोंदवण्यात आला आहे. अनेकदा असे दिसून आले आहे की, तरुण जोडपी, एकटेपणाच्या शोधात, कधी कधी एकाकी, निर्जन भागाच्या शोधात जंगलात घनदाट भागात जातात. वन्यप्राण्यांकडून हल्ला त्यामुळे होण्याची शक्यता आहे. येथील बाबूपेठ ते जुनोना जंगलापर्यंत अतिशय नयनरम्य व वनराईचा परिसर असल्याने रविवारच्या सुटीचा फायदा घेण्यासाठी तरुण जोडपे रस्त्याच्याकडेला झाडाझुडपांमध्ये दिसून येतात. मात्र, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये बाबूपेठ परिसरातील एका व्यक्तीला वाघाने शिकार बनवले होते. नुकतेच कारवा बिट येथे वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून वनविभागाने वाघांचा वावर असलेल्या या भागात जाण्यास मनाई केली आहे. मात्र, गस्तीवर उपस्थित असलेल्या वनरक्षकांना एक जोडपे जंगलाच्या दिशेने जाताना दिसले. त्यांनी त्याला त्या दिशेने जाण्यापासून रोखले दोघांमध्ये वाद झाला. वनरक्षकांनी त्यांच्याविरुद्ध वन कायद्यानुसार ट्रेस पासचा गुन्हा दाखल केला आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top