चंद्रपूर
(दि. १६
जानेवारी २०२४) –
तरुणाई
प्रेम भावनांनी भरलेले
असते.
एकमेकांना भेटण्यासाठी ते अनेक सीमा ओलांडतात. त्याचे परिणामही भोगावे
लागतात.
असाच प्रकार एका प्रेमी युगुलाच्या बाबतीत घडला. एकांत शोधण्यासाठी वाघाचा मुक्त संचार असलेल्या भागात पोहोचणे प्रेमात
असलेल्या जोडप्यासाठी अडचणीचे ठरले आहे. वनविभागाने या प्रेमी युगुलावर ट्रेस
पासचा गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा प्रथमच नोंदवण्यात आला आहे. अनेकदा असे दिसून आले आहे की, तरुण जोडपी, एकटेपणाच्या
शोधात, कधी कधी एकाकी, निर्जन भागाच्या शोधात जंगलात घनदाट भागात जातात.
वन्यप्राण्यांकडून हल्ला त्यामुळे होण्याची शक्यता आहे. येथील बाबूपेठ ते जुनोना
जंगलापर्यंत अतिशय नयनरम्य व वनराईचा परिसर असल्याने रविवारच्या सुटीचा फायदा
घेण्यासाठी तरुण जोडपे रस्त्याच्याकडेला झाडाझुडपांमध्ये दिसून येतात. मात्र, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये बाबूपेठ परिसरातील एका व्यक्तीला
वाघाने शिकार बनवले होते. नुकतेच कारवा बिट येथे वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून वनविभागाने वाघांचा वावर असलेल्या या भागात जाण्यास मनाई केली आहे. मात्र, गस्तीवर उपस्थित असलेल्या वनरक्षकांना एक जोडपे जंगलाच्या दिशेने जाताना दिसले. त्यांनी त्याला त्या दिशेने जाण्यापासून रोखले दोघांमध्ये वाद झाला. वनरक्षकांनी त्यांच्याविरुद्ध वन कायद्यानुसार ट्रेस पासचा गुन्हा दाखल केला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.