Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अज्ञात व्यक्तीने शेतात कापून ठेवलेला तुरीचा ढिगाला लावली आग
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
जवळपास दोन लाख रुपयाचे आर्थिक नुकसान प्रकरणाची संपूर्ण सखोल चौकशी करण्याची मागणी आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी कोरपना (दि...

जवळपास दोन लाख रुपयाचे आर्थिक नुकसान
प्रकरणाची संपूर्ण सखोल चौकशी करण्याची मागणी
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी
कोरपना (दि. ८ जानेवारी २०२४) -
        नांदा येथील रहिवासी विलास नथुजी राजगडकर यांची मौजा काकडघाट येथे असलेल्या शेतातील कापून ठेवलेले तुरीचे ढीग अज्ञात व्यक्तीने जाळून राख केल्याची घटना काल रविवारी घडली. या घटनेत शेत मालकाचे जवळपास 2 लाख रुपयाचे आर्थिक नुकसान झाले.

        प्राप्त माहितीनुसार काल रविवारी रात्रीला नांदा येथील रहिवासी विलास नथुजी राजगडकर यांची मौजा काकडघाट ता. राजुरा येथे शेत सर्वे क्रमांक 23 ही शेत जमीन आहे. सदर जमीनचे 5.23 हेक्टर क्षेत्रात यावर्षी कपाशी व तुरीची लागवड करून मागील 7 दिवसापासून तुरीची कापणी करून काल कापणी केलेली तुरीचे पेंड्या जमा करून एकत्रित ढिग केला होता. रविवार च्या रात्रीला अज्ञात इसमांकडून तुरीचा ढिगाला आग लावून संपूर्ण मालाची राखरांगोळी झाल्याने जवळपास 20 क्विंटल तुरीच्या पिकाचे नुकसान झाले. तुरीचा ढीग जाळला गेल्याने तूर व तुरी पासून होणारे कुटार असे जवळपास 2 लाख रुपयाचे आर्थिक नुकसान झाले. शेत मालकाने दिलेल्या राजुरा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात व्यक्तीने जाणीवपूर्वक त्यांच्या तुरीचा ठीग जाळून टाकला. जाळपोळ करणाऱ्या अज्ञात इसमाचा मोबाईल मुळे शोध घेता येऊ शकेल अशी शंका करत विलास राजगडकर ने राजुरा पोलिस ठाणेदाराना या प्रकरणाची जातीपूर्वक लक्ष देऊन उचित सखोल चौकशी करण्याची विनंती केली आहे. (aamcha vidarbha) (nanda phata)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top