Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: साहेब शेतकऱ्यांचा भोग संपणार तरी कधी..?
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
नांदा पुलाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर नांदा येथे जनसंवाद यात्रेत शेतकऱ्यांनी आमदारांना विचारले प्रश्न..! आमचा विदर्भ -धनराजसिंह शेखावत तालुका प्...
नांदा पुलाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
नांदा येथे जनसंवाद यात्रेत शेतकऱ्यांनी आमदारांना विचारले प्रश्न..!
आमचा विदर्भ -धनराजसिंह शेखावत तालुका प्रतिनिधी
कोरपना (दि. ९ सप्टेंबर २०२३) -
        गेल्या 20 वर्षापासून नांदा नाल्यावरील पुलाचा प्रश्न प्रलंबितच आहे. अजूनही पुलाचे बांधकाम सुरू न झाल्याने आज शेवटी साहेब शेतकऱ्यांचा  भोग संपणार तरी कधी..? असा गंभीर सवाल करीत नांदा येथील शेतकऱ्यांनी जनसंवाद यात्रेदरम्यान आमदारांना प्रश्न विचारले. (The issue of Nanda Bridge is again on the air)

        नांदा ते आसन गावाकडे जाणाऱ्या या मार्गावरील दोन पुलाचे बांधकाम करणे अत्यंत गरजेचे आहे. नांदा गावा लगत असलेल्या नाल्याला धरणाच्या पाण्याचा स्त्रोत असून नाला बारमाही वाहतो. सदर मार्ग हा गडचांदूर कोरपणा आंतरराजीय मार्गाला जोडणारा पोचमार्ग असल्याने अनेक विद्यार्थी कामगार तसेच शेतकरी या मार्गाने जीव मुठीत घेऊन ये करतात. यापूर्वी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री आता माजी खासदार हंसराज अहिर यांच्याकडेही गावकऱ्यांनी संबंधित पूलासाठी मागणी केली होती परंतु पुलाचे बांधकाम न झाल्याने गावकऱ्यांची निराशा झाली. राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी एक वर्ष आधी सदर पुलाची पाहणी केली आणि पूलाच्या बांधकामासाठी व मंजुरीसाठी प्रयत्न करू अशी आश्वासन दिले होते. मात्र एक वर्ष उलटूनही पुलाचे बांधकाम सुरू न झाल्याने व पावसाळ्यात शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने आज थेट शेतकऱ्यांनी आमदारांशी संवाद साधला. यावेळी सदर पूल मंजूर असल्याचे आमदार सुभाष धोटे (MLA Subhash Dhote) यांनी शेतकऱ्यांना सांगितले की सदर पुलाकरिता 1 कोटी 32 लाख रुपयाचे अंदाजपत्रक तयार असुन मंजूरी मिळाल्याचेही ते बोलले. सोबतच सदर कामाबाबत राज्याचे मंत्री संजय राठोड यांच्याशी त्यांचा संवाद सुरू असल्याचेही ते म्हणाले. गावातील 70 टक्के लोकांची शेती नाल्याच्या पलीकडे आहे. गेल्या अनेक वर्षापासून आल्यावर पूल नसल्याने शेतकऱ्यांना शेतात शेतीविषयक साहित्य व बी बियाणे नेण्यासाठी अडसर निर्माण होत आहे. गेल्यावर्षी सदर नाल्यातील पुरात बैलगाडी वाहून गेल्याची घटना घडली होती. त्यानंतर पंधरा दिवसांपूर्वी शेतकऱ्यांचे बैल वाहून गेले. सदर पूल अत्यंत गरजेचे असून यामुळे आसन लालगुडा, कडोली आदी गावे जोडली जाणार आहे. जवळपास 70 मीटर लांबीचे हे पूल झाल्यास याचा मोठा फायदा विद्यार्थ्यांसह कामगार व शेतकऱ्यांना होणार आहे. साहेब पूल करा अन्यथा सदर पुलाचे बांधकाम न झाल्यास आमरण उपोषण करण्याची भूमिका ही यावेळी शेतकऱ्यांनी आमदारांना बोलून दाखवली. (Farmers asked questions to the MLAs during the Jan Samswad yatra at Nanda..!) (nanda)

        आज झालेल्या जनसंवाद यात्रेत माजी सरपंच श्यामसुंदर राउत यांचेसह प्रगतशील शेतकरी अंकुश धाबेकर, नथू खोके, सुभाष खोके, महादेव गिरटकर, रमेश चौधरी, शंकर गोंडे, राहुल चटप, रत्नाकर विरुटकर, उमेश पोहणे, गुलाब इटनकर आदी शेतकऱ्यांनी आमदाराकडे ही मागणी लावून धरली. आमदाराच्या उत्तरानंतर शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असूनआता पुलाचे काम कधी सुरू होईल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. (korpana) (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top