Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: लोकसहभागातून नोकारी खुर्द मार्गे जाणाऱ्या प्रमुख मार्गांची दुरुस्ती
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
उपसरपंच वामन तुराणकर यांच्या पुढाकारातून झाले काम पूर्ण आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत तालुका प्रतिनिधी गडचांदूर (दि. ८ सप्टेंबर २०२३) -    ...

उपसरपंच वामन तुराणकर यांच्या पुढाकारातून झाले काम पूर्ण
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत तालुका प्रतिनिधी
गडचांदूर (दि. ८ सप्टेंबर २०२३) -
        तालुक्यातील नोकारी खुर्द हे गाव जिवती व कोरपणा कडे जाणाऱ्या मार्गांवर बसलेलं गाव आहे. या मार्गावरील नोकारी बु., बाम्बेझरी, लिंगनडोह व आसापूर हे गाव वसलेले आहे. या मार्गाची अत्यंत दुरावस्था होऊन मोठे खड्डे पडलेले होते. तसेच रस्त्याच्या कडेला जंगली झुडपांची मोठी वाढ झाली होती. यामुळं जनतेला होणारा त्रास लक्षात घेऊन नोकारी खु. चे उपसरपंच तुराणकर यांनी पुढाकार घेत लोकसहभागातून या मार्गाची दुरुस्ती करून जनतेचा प्रवास सोईचा करून दिला आहे. (The work was completed on the initiative of Upasarpanch Vaman Turankar)

        नोकारी बु., बाम्बेझरी, लिंगनडोह व आसापूर हे दुर्लक्षित गावे असून येथे विकासकामे बाकी आहेत. अनेक दिवसांपासून रस्त्याची दुरावस्था झाली असल्याने नागरिकांनी वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा केला. मात्र निष्ठूर प्रशासनाकडून कोणती कार्यवाही झाली नसल्याने नाकगरिकांनी एकत्र येत माणिकगड सिमेंट कंपनी ची मदत घेत रस्त्यावरील खड्डे गिट्टी व मातीने भरण्यात आले. तसेच रस्त्याच्या कडेला असलेले जंगली झुडूप तोडून रस्ता मोकळा करण्यात आला. माणिकगड कंपनी कडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या जे.सी.बी. मशीनद्वारा रस्त्यावरील पाण्याचा निचरा होण्यासाठी दोन्ही बाजूने नाली तयार करण्यात आली. लोकसहभागातून झालेल्या या लोकपयोगी कार्याचे कौतुक होत आहे. (aamcha vidarbha)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top