Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: वेकोलि सास्ती उपक्षेत्रात सुरक्षा नियमांची पायमल्ली
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सुरक्षा अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणाचा परिणाम आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे राजुरा (दि. १ जुलै २०२३) -         वेकोलि बल्लारपूर क्षेत्रातील ...
सुरक्षा अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणाचा परिणाम
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. १ जुलै २०२३) -
        वेकोलि बल्लारपूर क्षेत्रातील कोळसा खाणीत पावसाळा लागला असून सुद्धा कोणतीही उपाययोजना न केल्याबद्दल कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. वेकोलि बल्लारपूर क्षेत्रातील सास्ती ओपेनकास्ट खाणीतील व्यवस्थापक कार्यालय आणि लगतच्या मोटारसायकल स्टँड पहिल्याच पावसात चिखलमय झाला आहे. या मोटारसायकल स्टँड वर सुरक्षा नियमांची पायमल्ली होत गुरे ढोरे आश्रयाला असतात त्यामुळे सुरक्षेचे नियम डावलले जात असल्याने कधीही अपघात होऊ शकतो. (Consequence of negligence of security officer) (WCL Ballarpur Area) (Sasti Opencast Mine)

        मिळालेल्या माहितीनुसार, कोळसा खाणीतील सुरक्षेची जबाबदारी सुरक्षा व्यवस्थापनाची व सिव्हिल विभागाची असते मात्र या दोन्ही विभागांच्या दुर्लक्षामुळे व चुकीच्या नियोजनामुळे व्यवस्थापक कार्यालयासमोर चिखल साचले असून तिथे गुरे ढोरे वास्तव्यास पाहावयास मिळत आहे. कर्मचाऱ्यांची मोटार सायकल ठेवण्यासाठी स्टँड शेड बनवण्यात आले आहे, मात्र पावसाचे पाणी वाहून जात नसल्याने स्टॅण्डमध्ये सर्वत्र चिखल साचला आहे, त्यामुळे वाहने उभी करणे कठीण झाले असून त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. झोपलेल्या कारला. वेकोलि कर्मचाऱ्यांनी सांगितले कि, पीशी शावल सेक्शन येथील शेडमध्ये पावसाचे पाणी साचले असून तिथे काम करणे अवघड झाले आहे, डंपरच्या कठड्यावर चुकीच्या पद्धतीने चिखल टाकल्याने सुरक्षेचे नियम डावलून अपघाताची परिस्थिती निर्माण झाली आहे, या समस्यांबाबत काही जाणकार कर्मचाऱ्यांनी सांगितले व अधिकाऱ्यांकडे  अनेकवेळा तक्रारही केली मात्र याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. सर्व समस्या त्वरित सोडवावी अशी मागणी इंटक नेते आर.आर.यादव, विजय कानकाटे, महादेव तपासे, पांडुरंग नांदूरकर, बादल गर्गेलवार, ओबीसी वेल्फेअर असोसिएशनचे नेते एम.के.सेलोटे, रवी डाहुले, सचिन विद्दे यांनी केली आहे. 
(Coal India) (Rajura) (Aamcha Vidarbha)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top