आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. १ जुलै २०२३) -
वेकोलि बल्लारपूर क्षेत्रातील कोळसा खाणीत पावसाळा लागला असून सुद्धा कोणतीही उपाययोजना न केल्याबद्दल कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. वेकोलि बल्लारपूर क्षेत्रातील सास्ती ओपेनकास्ट खाणीतील व्यवस्थापक कार्यालय आणि लगतच्या मोटारसायकल स्टँड पहिल्याच पावसात चिखलमय झाला आहे. या मोटारसायकल स्टँड वर सुरक्षा नियमांची पायमल्ली होत गुरे ढोरे आश्रयाला असतात त्यामुळे सुरक्षेचे नियम डावलले जात असल्याने कधीही अपघात होऊ शकतो. (Consequence of negligence of security officer) (WCL Ballarpur Area) (Sasti Opencast Mine)
मिळालेल्या माहितीनुसार, कोळसा खाणीतील सुरक्षेची जबाबदारी सुरक्षा व्यवस्थापनाची व सिव्हिल विभागाची असते मात्र या दोन्ही विभागांच्या दुर्लक्षामुळे व चुकीच्या नियोजनामुळे व्यवस्थापक कार्यालयासमोर चिखल साचले असून तिथे गुरे ढोरे वास्तव्यास पाहावयास मिळत आहे. कर्मचाऱ्यांची मोटार सायकल ठेवण्यासाठी स्टँड शेड बनवण्यात आले आहे, मात्र पावसाचे पाणी वाहून जात नसल्याने स्टॅण्डमध्ये सर्वत्र चिखल साचला आहे, त्यामुळे वाहने उभी करणे कठीण झाले असून त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. झोपलेल्या कारला. वेकोलि कर्मचाऱ्यांनी सांगितले कि, पीशी शावल सेक्शन येथील शेडमध्ये पावसाचे पाणी साचले असून तिथे काम करणे अवघड झाले आहे, डंपरच्या कठड्यावर चुकीच्या पद्धतीने चिखल टाकल्याने सुरक्षेचे नियम डावलून अपघाताची परिस्थिती निर्माण झाली आहे, या समस्यांबाबत काही जाणकार कर्मचाऱ्यांनी सांगितले व अधिकाऱ्यांकडे अनेकवेळा तक्रारही केली मात्र याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. सर्व समस्या त्वरित सोडवावी अशी मागणी इंटक नेते आर.आर.यादव, विजय कानकाटे, महादेव तपासे, पांडुरंग नांदूरकर, बादल गर्गेलवार, ओबीसी वेल्फेअर असोसिएशनचे नेते एम.के.सेलोटे, रवी डाहुले, सचिन विद्दे यांनी केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.