Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: ग्रामपंचायत कामगार सेनेचा २० जुलैला मुंबई येथे विधान भवनावर धडक मोर्चा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे चंद्रपूर (दि. १६ जुलै २०२३) -         राज्यात 60 हजार ग्रामपंचायत कर्मचारी (Gram Panchayat Staff) हे गेल्या ...
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
चंद्रपूर (दि. १६ जुलै २०२३) -
        राज्यात 60 हजार ग्रामपंचायत कर्मचारी (Gram Panchayat Staff) हे गेल्या 10 ते 20 वर्षां पासून आपल्या हकाच्या मागणी साठी झटत आहे परंतु राज्य सरकार कर्मचाऱ्यांना तारखी वर तारीख देऊन देत आहे. ग्रामपंचायतचा कर्मचारी याना वेतन श्रेणी नाही आणि जुनी पेन्शन सुद्धा चालू ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना लागू नाही. या कर्मचाऱ्याकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष होत आहे. अंगणवाडी सेविकेला 15 हजार पगार आहे. शिक्षकांना 70 ते 80 हजार पगार आहे. ग्राम सेवकांना 70 हजार पगार आहे व त्यांना जून पेन्शन सुद्धा लागू केल आहे मात्र ग्राम पंचायतचा कर्मचाऱ्यांना पेंशनतर नाहीच तर पगारही कमी मिळत आहे. (chandrapur) (aamcha vidarbha)

        फक्त केंद्रीय व राज्यातील कर्मचाऱ्यांचे पगार वाढविण्याकरिता शासनाकडे पैसा आहे मात्र गावात राबणाऱ्या ग्रामपंचायतचा कर्मचाऱ्यांचे पगार वाढविण्यासाठी काहीही तरतूद नाही म्हणून महाराष्ट्र राज्य कामगार सेना द्वारे विविध मागण्याकरिता २० जुलैला मुंबई येथे विधान भवनावर धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती संघटनेतील कर्मचाऱ्यांनी दिली. 

प्रमुख मागण्या -
  • ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालीका व जिल्हा परिषद कर्मचाऱ्याप्रमाणे वेतनश्रेणी मंजूर करणे. 
  • ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन लागु करणे. 
  • ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना उपदान लागु करणे 
  • ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांची भविष्यनिर्वाह निधीची रक्कम कामगार भविष्य निधी संघटन (इ.पी.एफ.) या कार्यालयात करणे. 
  • ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना सुधारीत किमान वेतन लागु करणे व वेतनासाठी लादलेली वसुलीची अट रद्द करणे. 
  • ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधात सुधारणा करणे. 
  • जिल्हा परिषद सेवेत ग्राम पंचायत कर्मचाऱ्यामधून एकुण रिक्त पदाच्या १०% प्रमाणे वर्ग ३ व वर्ग ४ चे पदावर नियुक्ती देणे.




About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top