Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: गडचांदूर-भोयगाव-घुग्गुस-चंद्रपूर मार्ग बंद
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
भोयगाव वर्धा नदी पुलावर पाणी आज दुपार पासून अंतरगांव-नारंडा रस्ताही बंद पुलावरून पाणी वाहत असताना दुचाकी चालकांचा धाडसपणा जीवावर बेतणार - बघ...

भोयगाव वर्धा नदी पुलावर पाणी
आज दुपार पासून अंतरगांव-नारंडा रस्ताही बंद
पुलावरून पाणी वाहत असताना दुचाकी चालकांचा धाडसपणा जीवावर बेतणार - बघा व्हिडीओ
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत तालुका प्रतिनिधी
गडचांदूर (दि. २२ जुलै २०२३) -
        मागील पाच दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. अशातच भोयेगाव पुलावरून पाणी वाहत असल्याने गडचांदूर भोयगाव धानोरा मार्ग काल शुक्रवार दि. २१ जुलै ला सायंकाळी ८ वाजताच्या दरम्यान बंद करण्यात आला आहे. या मार्गावर गडचांदूर पोलिसांनी बंदोबस्त लावून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला असून नागरिकांनी व वाहतुकदारांनी सतर्क राहण्याचे आवाहन गडचांदुरचे पोलीस निरीक्षक रविंद्र शिंदे यांनी केले आहे. (Water on the Bhoigaon Wardha River Bridge) (Police Station Gadchandur)

         (Wardha River) वर्धा नदीच्या प्रवाहात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने धानोरा पूल पाण्याखाली गेला आहे. वर्धा नदीलगत असलेली शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांच्या शेतपिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वर्धा नदीवरील पुलावर जवळपास १०-१२ फूट पाणी असल्याने गडचांदूर-भोयगाव-घुग्गुस-चंद्रपूर मार्ग अवरूद्ध झाला आहे. गडचांदर भोयगाव मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून गडचांदूर पोलिसांनी या मार्गावर बंदोबस्त लावले आहे. मार्ग अवरुद्ध झाल्याने या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. गडचांदूर-भोयेगाव मार्गे चंद्रपूर कडे जाणाऱ्या वाहन चालकांनी दुसऱ्या पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच आज आज दुपारी जवळपास तीन वाजेपासून दालमिया सिमेंट कंपनी जवळील नारंडा ते अंतरगांव-आवरपूर रस्ताही बंद झाला असून पुलावरून पाणी वाहत असताना काही दुचाकीचालक आपले वाहन तिथून काढत असतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल होताच नागरिकांनी तिथेही पोलीस बंदोबस्त वाढविण्याची मागणी केली आहे. (gadchandur) (aamcha vidarbha)


About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top