Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: आर्वी येथे जलशुध्दीकरण यंत्राचे लोकार्पण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मा जी जिप सभापती सुनील उरकुडे यांच्या पुढाकारातून आर्वी वासियांना मिळणार शुद्ध पिण्याचे पा णी आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे राजुरा (दि. १०...

माजी जिप सभापती सुनील उरकुडे यांच्या पुढाकारातून आर्वी वासियांना मिळणार शुद्ध पिण्याचे पाणी
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. १० जून २०२३) -
        स्वतःच्या जिप निर्वाचन क्षेत्रा सोबतच संपूर्ण तालुक्यात विकास कामे खेचून आणणारे यशस्वी माजी जिप सदस्य तथा सभापती सुनील उरकुडे 
(Sunil Urkude) यांनी आपल्या कारकीर्दीत राजुरा तालुक्याच्या ग्रामीण भागात जिपच्या माध्यमातून अनेक विकास कामे मंजूर केली. त्यात आर्वी येथील सरपंच व ग्राम वासियांची आरो ची मागणी करताच पक्ष भेद न करता त्यांनी आर्वी येथे आरो करीता जिल्हा निधी 2021-22 अंतर्गत रुपये पाच लाख मंजूर करून दिले. त्या आरो चे दिनांक 8 जून 2023 ला लोकार्पण माजी जिप सभापती सुनील उरकुडे यांच्या हस्ते पार पडले. (rajura)

        राजकारणात कसलाही भेदभाव न करता सर्वसामान्य लोकांकरिता निधी मंजूर करून दिल्याबद्दल ग्रामपंचायत तर्फे सुनील उरकुडे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व गावातील इतर समस्येसाठी सुद्धा निधी मंजूर करून द्यावा अशी मागणी करण्यात आली, आपण राजुरा ग्रामीण भागाच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत तुमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करून देऊ असे आश्वासन यावेळी सुनील उरकुडे यांनी दिले. 

        यावेळी आर्वी येथील सरपंच शालूताई लांडे, माजी सरपंच सुधाकर महकुलकर, माजी उपसरपंच सुभाष काटवले, विजय उपरे, तंटा मुक्ती अध्यक्ष दादाजी जा, ग्रामसेवक तथा सूरज माथनकर आदींची उपस्थिती होती. (aamcha vidarbha)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top