Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: मन कि बात कार्यक्रमाचा १०० वा भाग प्रसारित
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
बल्लारपुरात शेकडो लोकांनी शतक महोत्सवी संवादात दर्शविली उपस्थिती आमचा विदर्भ - एच.एन. (राजेश) प्रतिनिधी बल्लारपूर -         देशाचे लाडके पंत...
बल्लारपुरात शेकडो लोकांनी शतक महोत्सवी संवादात दर्शविली उपस्थिती
आमचा विदर्भ - एच.एन. (राजेश) प्रतिनिधी
बल्लारपूर -
        देशाचे लाडके पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या 'मन की बात' या कार्यक्रमाचा १०० वा भाग नुकताच प्रसारित झाला. देशाचे पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी यांच्या ‛मन की बात’या विशेष कार्यक्रमाचा ऐतिहासिक १०० वा भाग (शतक महोत्सवी संवाद) थेट प्रक्षेपणाद्वारे टिव्ही स्क्रीनवर पाहण्याकरिता स्थानिक प्रभाग क्रमांक १ व २ येथील KGN शाळा, डॉ. राजेंद्र प्रसाद वॉर्ड बल्लारपूर येथे लोकांची उपस्थिती दर्शविली होती. 

        यावेळी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष हरीश शर्मा, माजी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. रेणुका दुधे, सामाजिक कार्यकर्त्या प्रा.सौ. शुभांगी हरीश शर्मा, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मोहीत डंगोरे, भाजप नेते गुलशन शर्मा, प्रकाश दोतपेल्ली, अरविंद दुबे, रींकु गुप्ता, श्रीमती सरला लांडे, सौ. शामला डंगोरे, जिल्हा पदाधिकारी तथा कार्यकर्त्यां व मोठ्या संख्येने स्थानिक नागरीक उपस्थित होते. 

        यावेळी माजी नगराध्यक्ष हरीश शर्मा यांनी सांगितली कि, “मन की बात’ हे शासनामध्ये लोकांच्या सहभागाचे आणि आपला दृष्टीकोन, सूचना आणि कामगिरी पंतप्रधानांपर्यंत पोहोचवण्याचे माध्यम बनले आहे” “देशाच्या विकासासाठी महत्त्वाचे असलेले अनेक विषय मन की बात अधोरेखित करतो”. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top