Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: रास्ता बांधकामात घोळ - रस्ते बांधण्याच्या नावाने धूळफेक
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मातीवरच केले डांबरीकरण, पापडीसारखा उखडत आहे रस्ता दोषी अधिकाऱ्याची सेवेतून हकालपट्टी करण्याची मागणी सदर व्हिडीओ केंद्रीय बांधकाम मंत्री निती...
मातीवरच केले डांबरीकरण, पापडीसारखा उखडत आहे रस्ता
दोषी अधिकाऱ्याची सेवेतून हकालपट्टी करण्याची मागणी
सदर व्हिडीओ केंद्रीय बांधकाम मंत्री नितीनजी गडकरी यांनाही पाठविणार असल्याचे समजते
बाघा व्हिडिओ -
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
कोरपना (दि. ९ जानेवारी २०२३) -
        केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपाइंचे (आठवले) राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Aathvale) हे "जागतिक धम्म ध्वज दिन सोहळा"च्या निमित्याने रविवार दिनांक 8 जानेवारी रोजी कोरपना तहसील येथे दौर्‍यावर येत आहेत. केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे आवारपूर-नांदाफाटा मार्गे गडचांदूरला जात असल्याची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभाग गाढ झोपेतून जागे झाले व हेतुपुरस्पर गेल्या सात महिन्यांपासून पूर्णपणे खचलेल्या बिबी ते आवारपूर रस्त्याच्या पुनर्बांधणीला सुरुवात केली. या रस्त्याचे काम एका बड्या व नावाजलेल्या कंत्राटदाराने घाईगडबडीत केल्याने दुसऱ्याच दिवशी काही लोकांनी बोटानेच मातीवरच केले डांबरीकरण केलेला रास्ता उखडवून दाखविला, याकामाने बांधकाम विभागाचे एकदा पुन्हा पितळे उघडे पडले असून अश्या थातुरमातुर कामातून लोकांकडून आलेल्या टॅक्सचे पैशाची उधळपट्टी करणाऱ्या अधिकाऱ्यांची सेवेतूनच हकालपट्टी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. सदर व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला असून सदर व्हिडीओ, केंद्रीय बांधकाम मंत्री नितीनजी गडकरी यांना सुद्धा पाठविण्यात येत असल्याचे समजते. ( World Dhamma Flag Day Celebration) (Department of Public Works) (nitin gadkari)

        केंद्रीय मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे बांधकाम विभागाने आवारपूर ते गडचांदूर रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी गेल्या 6 ते 7 महिन्यांपासून मनसे, शेतकरी संघटनेने मोर्चे काढून आंदोलन केले होते. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे तिळमात्रही लक्ष दिले नाही. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने अनेक वाहने घसरून छोटे-मोठे अपघात झाले आहेत. असे असतानाही रस्त्याची दुरुस्ती झाली नाही. मनसेचे प्रकाश बोरकर यांनीही काही दिवसांपूर्वी १० दिवसांत रस्ता दुरुस्त करण्याचा अल्टिमेटम दिला होता. मात्र या मार्गावरून केंद्रीय मंत्र्यांच्या दौरा होणार असे माहित होताच सार्वजनिक बांधकाम विभाग साखर झोपेतून खडबडून जागे झाले व खड्डे बुजवून रात्रंदिवस काम करून रस्त्याचे नूतनीकरण सुरू केले. कंत्राटदाराकडून घाईगडबडीत केलेल्या रस्त्याच्या अनेक खड्ड्यांमध्ये ४० मिमी गिट्टी टाकल्यानंतर त्यावर थेट डांबराचा थर टाकला जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांच्या सहभागाने रस्त्याची धूळ न काढताच थेट मातीवरच डांबरीकरण करण्यात आले असल्याचा आरोप नागरिक करीत आहे. मंत्र्यांच्या दौऱ्यात घाईगडबडीत तयार करण्यात येत असलेल्या या रस्त्याच्या कामाकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक डोळेझाक केली असून निकृष्ट दर्जाचा रस्ता तयार करण्यात आल्याचा आरोपही होत आहे. अशाप्रकारे बांधलेला हा रस्ता किती काळ टिकेल, हे सांगणे कठीण असल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत. 

        डांबरीकरणाची पद्धत व सदर रस्त्याचा निकृष्ट दर्जा लक्षात घेऊन काही सुजाण नागरिकांनी संबंधित ठेकेदाराने नागरिकांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून मातीने भरलेल्या रस्त्यावर डांबरीकरण सुरू केले. आज काही नागरिकांनी स्वत:च्या हाताने निकृष्ट डांबरीकरण होत असलेला रस्ता हाताच्या बोटानेच पापडीसारखा उखडून दाखवीत ठेकेदाराचा कामाचा पर्दाफाश केला आहे. तसेच जनतेच्या पैशाची उधळपट्टी केल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. मंत्र्यांच्या दौऱ्याच्या ताफ्यात शेकडो गाड्या भरधाव वेगात चालतात हे सर्वविदित असूनही नित्कृष्ट डांबरीकरणाने मंत्र्यांच्या ताफ्याचा अपघात झाल्यास याला जबाबदार होणं असा सवालही नागरिकांनी केला आहे.  सदर व्हिडीओ केंद्रीय बांधकाम मंत्री नितीनजी गडकरी (nitin gadkari) यांनाही पाठविणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.  संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबतच ठेकेदाराच्या निकृष्ट कामाची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top