Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: आठवडी बाजारात तिघांचे मोबाइल चोरट्याने पळविले
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राजूरात भामट्या चोरांचा धुमाकूळ आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. २५ डिसेंबर २०२२२)       शहरातील शनिवारी भरणाऱ्या आठवडी बाजारात होणाऱ्या...
राजूरात भामट्या चोरांचा धुमाकूळ
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. २५ डिसेंबर २०२२२)
      शहरातील शनिवारी भरणाऱ्या आठवडी बाजारात होणाऱ्या गर्दीचा फायदा घेत मोबाइल व भुरट्या चोरीच्या घटनेत पुन्हा वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आठवडी बाजारात अनेकांची महागडे मोबाईल चोरट्यानी लंपास केले. त्यापैकी काही जणांनी पोलिसात तक्रार दाखल केली, चोरांचा पत्ता पोलिसांना लागतो कि नाही हा वेगळा विषय असून शनिवारी (२४ डिसेंबर) रामपूर येथील व्यापारी मनीष शर्मा, वेकोलि कर्मचारी तुळशीरामजी जेंगठे व एका इसम अशे तीन जणांचे मोबाईल अज्ञात चोरट्यानी लंपास केल्यामुळे चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी आता नागरिकांतून होत आहे. (Scam of thieves in Rajura) (mobil chor)

      शहरात प्रत्येक शनिवारी आठवडे बाजार भरतो खरेदीसाठी बाजारपेठेत आलेल्या नागरिकांचे किमती मोबाईल आणि ऐवज लांबविण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत चाललेल्या असून पोलिस प्रशासनाकडून नियंत्रण केले जात असताना ही चोरट्यानी पुन्हा मोबाईल पळविल्याने पोलिसांच्या कार्यशैलीवरच शंका उपस्थित होत आहे. दोन पैसे खरेदीतून वाचेल या आशेने आठवडी बाजारात येणाऱ्या लोकांच्या महागड्या मोबाईल व ऐवजावर भामटे चोर डल्ला मारत असून पोलिसांनी या भामट्या चोरांचा वेळीच बंदोबस्त करावा, एखादा भामट्या चोर आमच्या हाती लागल्यास त्याचे लचके तोडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा शिवसेना तालुका प्रमुख निलेश गंपावार यांनी दिला आहे. (shivsena taluka pramukh nilesh gampawar)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top