Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: रामाला तलावाच्या दुर्गंधीने नागरिक त्रस्त
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी राजुरा (दि. ६ डिसेंबर २०२२) -         चंद्रपुरातील प्राचीन ऐतिहासिक रामाळा तलावाला तब्बल बारा वर्षां...
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा (दि. ६ डिसेंबर २०२२) -
        चंद्रपुरातील प्राचीन ऐतिहासिक रामाळा तलावाला तब्बल बारा वर्षांनंतर पुन्हा जलपर्णी या वनस्पतीने विळखा घातला आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढण्यासोबतच तलावातील जलचरांच्या जिवांना धोका होईल, अशी चिंता पर्यावरणप्रेमींना वाटत आहे. तसेच जीवघेणे दुर्गंधीला लागतच्या नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. औद्योगिकीकरणामुळे शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे अनेक तलाव नागरी वस्त्यांनी गिळंकृत केले. आजच्या घडीला शहरात रामाळा एकमेव तलाव आहे. त्याच्यावरही आता अतिक्रमण सुरू आहे. कोळसा खाणींमुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली आहे. मात्र, या तलावामुळे शहरातील काही भागातील भूगर्भात पाण्याची पातळी कायम राहायला मदत होत आहे.येथे सौंदर्यीकरणासाठी तलावाचा मोठा भाग बुजविण्यात आला आहे. उर्वरित तलावात बाराही महिने पाणी असते. या तलावावर २००८ साली पहिल्यांदा जलपर्णीचे संकट आले. 




तेव्हा उद्योगांच्या मदतीने जलपर्णी काढण्यात आली. त्यासाठी आधी तलाव कोरडा करण्यात आला. त्यानंतर अनेकदा जलपर्णीने आक्रमण केले. प्रत्येक वेळी हातपाय पसरण्यापूर्वीच मच्छिमार सोसायटीने जलपर्णी बाहेर काढली.त्यामुळे मागील बारा वर्षांत ही वनस्पती वाढली नाही. यावर्षी तलावाच्या खोलीकरणासाठी उन्हाळ्यात पाणी सोडण्यात आले. परंतु, खोलीकरण झाले नाही. पावसाळ्यात घाण पाणी तलावात साचले आणि जलपर्णीने आपले हातपाय पसरले. ही वनस्पती घाण पाण्यातच वाढते. यावेळी तिला पोषक असे पाणी मिळाल्याने तलावाचा बहुतांश भागात आता ती पसरली आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top