Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author We publish the news of Vidarbha level prominently on our website. If you are interested in doing digital journalism then you can join us. We also work for our advertisers to reach their advertisements to thousands of readers every day. any suggestion please message this mobile number 9975977378 email - samarthbharat3@gmail.com
Title: निवडणुकीचे वारे सुरू होताच मोकाट जनावरांवर कारवाई सुरु
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
15 ते 20 जनावरे बिबी येथील कोंडवाड्यात टाकले आता जनावरे मोकाट सोडल्यास होणार फौजदारी गुन्हा दाखल धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गड...
15 ते 20 जनावरे बिबी येथील कोंडवाड्यात टाकले
आता जनावरे मोकाट सोडल्यास होणार फौजदारी गुन्हा दाखल
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
नांदाफाटा वासीयांना मागील अनेक वर्षापासुन मोकाट जनावरांचा मोठा त्रास होत आहे. नागरिकांनी अनेकदा मोकाट जनावरांच्या मालकांना जनावरे मोकाट सोडू नये अशी सुचना द्यावी या उपरांतही मोकाट जनावरे सोडत असतील ग्रामपंचायतीने सर्व मोकाट जनावरे कोंडवाड्यात टाकावी अशी मागणी करण्यात आली होती. परंतु ग्रामपंचायत प्रशासनाने या समस्येकडे कधीच लक्ष नाही दिले. निवळणुकीचे वारे सुरू होताच या मोकाट जनावरांना कोंडवड्यात टाकण्यात आले.
नांदाफाटा येथील रस्त्यावर नेहमी 20 ते 30 जनावरे मोकाट फिरताना किंव्हा रोडवर बसलेले असताना आढळून येत होते. या मुळे अनेकदा नागरीकांचे लहान मोठे अपघात झाले होऊन जखमी झाले. काही दिवसापुर्वी झालेल्या अपघातात 3 जनावरे दगावली व 2 गंभीर रित्या जखमी झाले होते.
गावातील नारिकांनी आणि व्यापारी वर्गातून अनेक वेळा मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी विनंती करण्यात आली होती. स्थानीय अनेक दुकानदारांना रात्रीला आपल्या दुकानापुढे दोऱ्या बांधून राखण करावी लागत होती, अन्यथा सकाळी उठताच मोकाट जनावरांचा शेणाचे पोईटे उचलावे लागत होते. निवळणुक तोंडावर आल्याने आपल्या मतदार असलेल्या स्थानीय नागरिकांची नाराजी दूर करण्यासाठी काहोईना पण काल रात्री दिनांक ३०/०९/२०२२ रोजी 15-20 जनावरे बिबी येथील कोंडवाड्यात पाठविण्यात आल्याने येथील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. व्यापारी वर्ग आणि स्थानीय नागरिकांनी प्रशासक व सचिवांचा  मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी मनापासून धन्यवाद केला आहे.
जनावंराच्या मालकांना विनंती आहे की नागरिकांना होणारा त्रास आणि अपघाताची भीती लक्षात घेता कुणीही आपली जनावरे मोकाट सोडू नये, अन्यथा त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. 
श्रीहरी केंद्रे, ग्रामसेवक, ग्राम पंचायत नांदा

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top