Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: ट्रॅव्हल्स पुराच्या पाण्यात अडकली
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
ट्रॅव्हल्स पुराच्या पाण्यात अडकली पोलिसांच्या रूपात देवदूतांनी वाचविले प्रवाश्यांचे प्राण अविनाश रामटेके - आमचा विदर्भ प्रतिनिधी विरूर स्टेश...
ट्रॅव्हल्स पुराच्या पाण्यात अडकली
पोलिसांच्या रूपात देवदूतांनी वाचविले प्रवाश्यांचे प्राण
अविनाश रामटेके - आमचा विदर्भ प्रतिनिधी
विरूर स्टेशन -
हैदराबाद वरून चिंचोली विरुर मार्गे छत्तीसगड कडे जाणारी ट्रॅव्हल्स चिंचोली नाल्यात अडकल्याने प्रवाश्याचा जीव टांगणीला लागला होता, मात्र विरुर पोलिसांना या बद्दल माहिती मिळताच लगेच मदत करीत मोठ्या परिश्रमातून सर्व प्रवाशांना बाहेर सुखरूप काढले त्यामुळे मोठा अनर्थ टळला. तेलंगणात कामासाठी गेलेले मजूर परत आपल्या छत्तीसगड राज्यात खाजगी ट्रॅव्हल्स क्रं. MP-50 P-1116 ने निघाले तेलंगणातील शिरपूर मार्गे चिंचोली-विरुर मार्गे येत असताना चिंचोली नाल्यातील पुलावर पाण्याचा अंदाज न घेता चालकाने ट्रॅव्हल्स टाकली आणि त्यात ट्रॅव्हल्स फसली सगळीकडे पाणीच पाणी असल्याने प्रवाश्यांची जीव वाचविण्याची घडपळ सुरु झाली. एकाने पोलिसांच्या 12 क्रमांकावर फोन करून माहिती दिली. विरुर पोलिसांना संदेश आला आणि क्षणाचाही वेळ न लावता सहायक पोलिस निरीक्षक राहुल चव्हाण आणि पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचारी घटनास्थळी जाऊन रेस्क्यू मोहीम सुरू केली. काही ग्रामस्थाच्या मदतीने मोठ्या प्रयत्नाने जीव धोक्यात घालून बस मधील 25 लहान बालकासह पुरुष महिला प्रवाश्याना सुखरूप बाहेर काढले लगेच त्यांना राहण्याची व्यवस्था करण्यात आली. पोलिसांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top