Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: राजुरा महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदींना पाठवले पत्र
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राजुरा महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदींना पाठवले पत्र वाढत्या महागाईचा केला निषेध विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी ...
राजुरा महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदींना पाठवले पत्र
वाढत्या महागाईचा केला निषेध
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
'बहुत हुई महंगाई की मार, अबकी बार मोदी सरकार' चा नारा देत सत्तेवर आलेल्या केंद्र सरकारने मागील काही वर्षांत सातत्याने जीवनावश्यक व मुलभूत गरजा असणाऱ्या वस्तूंच्या किंमतीत वाढ करून जनसामान्यांना महागाईच्या खाईत लोटले आहे. येत्या १८ तारखेपासून गृहिणींना स्वयंपाकात उपयोगी अन्नधान्य, कणीक, डाळ, दुग्धजन्य पदार्थ यावर ५%जी.एस.टी लादली जाणार असून यामुळे गृहीणींचे कौटुंबिक बजेट पुर्णपणे बिघडणार आहे. त्यामुळे ही जी.एस.टी वाढ आणि सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती कमी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्याताई सवालाखे, चंद्रपूर जिल्हाध्यक्षा नम्रता ठेमस्कर आणि लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या मार्गदर्नाखाली राजुरा महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महागाई कमी करण्यासाठी आवाहन करणारे पत्रे पाठवली आहेत. 
या प्रसंगी राजुरा महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा संध्या चांदेकर, माजी जिप सदस्य मेघाताई नलगे, माजी सभापती कुंदाताई जेणेकर, अर्चना गर्गेलवार, योगिता भोयर, पुनम गिरसाळवे, ज्योती शेंडे, हिना शेख, निता बानकर, रेखा बोढे यासह अनेक महिला कार्यकर्त्यां उपस्थित होत्या.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top