Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रू. नुकसान भरपाई द्या आमदार सुभाष धोटे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रू. नुकसान भरपाई द्या आमदार सुभाष धोटे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी आमचा विदर्भ - न्यू...
अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रू. नुकसान भरपाई द्या
आमदार सुभाष धोटे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क 
राजुरा -
राजुरा मतदार संघातील राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरी तालुक्यात गेली 10 ते 12 दिवसापासून सतत मुसळधार पावसामुळे शहरी व ग्रामीण भागातील नदी, नाले मोठ्या प्रमाणात वाहत असल्यामुळे शेतातील उभी पिके जमिनीत गाळल्या गेली आहेत, तसेच अति पाऊसामुळे शेती खरवळुन गेल्यामुळे नुकतीच काही दिवसापुर्वी पेरणी झालेली पिके वाहुन गेली असुन शेती करण्यायोग्य राहलेली नाही. पूरग्रस्त भागातील शेतकन्यांवर दुबार पेरणीची वेळ उद्भवलेली आहे. तसेच काही भागात पूर परिस्थितीने शेतात पाणी साचून असल्याने शेतातील पिके खराब झालेली आहेत. ग्रामिण भागात नदी, नाले ओसंडुन वाहत असल्यामूळे अनेकांच्या घरात पुराचे पाणी गेले असुन जिवनावश्यक वस्तु पाण्यात बुडाल्याने व शेतीविषयक अवजारे व खते वाहुन गेल आहेत. त्यामुळे अनेक कुटुंबियांवर उपासमारीची वेळ उद्भवलेली आहे.
करीता राजुरा मतदार संघातील राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरी तालुक्यामधील अतिवृष्टी व पुरपरीस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रु. प्रमाणे नुकसान भरपाई देणेसंदर्भाने तातडीची कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी आमदार सुभाष धोटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top