Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: विरुरात पिसाळलेल्या कुत्र्यांची दहशत
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
विरुरात पिसाळलेल्या कुत्र्यांची दहशत एकाच दिवशी दोन मुलासह बारा जणांवर केला हल्ला पिसाळलेल्या कुत्र्यांना पकडण्यासाठी गावात कोणतीही यंत्रणा ...

  • विरुरात पिसाळलेल्या कुत्र्यांची दहशत
  • एकाच दिवशी दोन मुलासह बारा जणांवर केला हल्ला
  • पिसाळलेल्या कुत्र्यांना पकडण्यासाठी गावात कोणतीही यंत्रणा नाही
अविनाश रामटेके - आमचा विदर्भ प्रतिनिधी
विरुर स्टेशन - 
गावात व आपल्या घरी दैनंदिन काम करीत असताना पिसाळलेल्या मोकाट कुत्र्यांनी एकाच दिवशी तब्बल बारा जणांवर हल्ला चढवून लचके तोडून जखमी केल्याची घटना राजुरा तालुक्यातील विरुर स्टेशन येथे घडली. या पिसाळलेला कुत्र्याच्या हल्ल्यात घरीच खेळत असलेल्या दोन लहान मुलांचा समावेश असल्याने गावात कमालीची दहशत पसरल्याचे दिसून येत आहे. या सर्व जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्र चिंचोली येथे हलविण्यात आले. या गंभीर स्थिती ची खबरदारी म्हणून ग्रामपंचायत ला नागरिकांकडून माहिती देण्यात आली मात्र या पिसाळलेल्या कुत्र्यांना पकडण्याची कोणतीही यंत्रणा गावात दाखल झाली नाही त्यामुळे जनतेत ग्राम पंचायत प्रशासन विषयी असंतोष वाढत असल्याचे दिसून येत आहे. 
या संदर्भात ग्राम पंचायत विरुर यांनी पशुसंवर्धन विभागाला रीतसर पत्र पाठवून सदर पिसाळलेला  कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली मात्र अजूनही प्रशासनाकडून कोणतीही कारवाही होत नसल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top