आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
जिवती -
जिवती तालुक्यातील अनेक गावात आज सायंकाळी अवकाळी पावसाचा तडाका बसला. अवकाळी वादळी वाऱ्यांसह अनेकाच्या घरावरील टिनपञे उडाली. मात्र जीवित हानी झाली नसली तरी मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत करावी अशी मागणी तालुक्यातील नागरीकांकडून केली जात आहे.
१५ मिनिटे चाललेल्या या वादळी वारा व अवकाळी पावसामुळे नागरिक भयभीत झाले. या अवकाळी पावसामुळे अनेकांना बेघर केल्याचे चिञ निर्माण झाले आहे. टेकअर्जुनी येथील माधव तांबोले, मधुकर वारे, बाबु तांबुळे, महारुद्र मुळे, रामकृष्ण फड, उत्तम वारे, बालाजी वारे तर देवलागुडा येथील शंकर थावरू राठोड, वसंत शंकर राठोड, देविदास राठोड यांच्या छतावरील टिनपञे उडाल्याने घरातील साहित्याची नासाडी होऊन मोठे नुकसान झाले आहे. सायंकाळी झालेला अवकाळी व वादळी पावसाचे तांडव जिवती, देवलागुडा, टेकाअर्जुनी, लोलडोहसह तालुक्यातील बहूतांश गावाला बसल्याने अनेकांच्या शेतातील फळझाडे तुटून पडल्याने मोठे नुकसान झाल्याचे चिञ बघायला मिळत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.