Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: देशी दारू दुकानाविरोधात जिल्हाधिकाऱ्यांना पाठवणार पाच हजार पत्रे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
देशी दारू दुकानाविरोधात जिल्हाधिकाऱ्यांना पाठवणार पाच हजार पत्रे  जनविकास सेनेचे अनोखे आंदोलन वेगवेगळ्या आंदोलनातून वेधत आहेत लक्ष डी.एस. ख्...

  • देशी दारू दुकानाविरोधात जिल्हाधिकाऱ्यांना पाठवणार पाच हजार पत्रे 
  • जनविकास सेनेचे अनोखे आंदोलन
  • वेगवेगळ्या आंदोलनातून वेधत आहेत लक्ष
डी.एस. ख्वाजा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
दाताळा रोडवरील जगन्नाथ बाबा मठाजवळील देशी दारु दुकान हटविण्यासाठी जनविकास सेनेचे अध्यक्ष तथा नगरसेवक पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात परिसरातील नागरिक एकवटले असून दुकान हटविण्यासाठी वेगवेगळे आंदोलन करुन प्रशासनाचे लक्ष वेधत आहे. दरम्यान शनिवारी दुकान हटविण्याच्या मागणीसाठी पाच हजार पत्र पाठविण्याचा निर्धार करीत नोख्या आंदोलनाला सुरुवात केली आहे. 
दाताळा रोड मार्गावरील जगन्नाथ बाबा मठ परिसरात नव्याने दारु दुकानाला परवानगी देण्यात आली. मात्र या दुकानाला परिसरातील नागरिकांचा विरोध आहे. त्यामुळे उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी जनविकास सेनेतर्फे दुकान बंद करण्यात आले. दुकानाचे स्थलांतरण करण्याच्या मागणीसाठी परिसरातील नागरिकांनी दुकानासमोरच सत्याग्रह आंदोलन सुरु केले. आंदोलनात महिलांनी सहभागी होत भजन आंदोलन करुन प्रशासनाचे लक्ष वेधले. तर शनिवारपासून जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून दुकानाचे स्थलांतरण करण्याची मागणी करण्यात येत आहे. या आंदोलनात जिल्हाधिकाऱ्यांना सुमारे पाच हजार पत्र पाठवून दुकानाचे स्थलांतर करण्याची मागणी करण्यात येणार आहे. जगन्नाथबाबा नगर परिसरातील प्रत्येक घरी जाऊन याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच नागरिकांकडून पत्रावर स्वाक्षरी घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना पाच हजार पत्रे पाठविण्यात येणार आहेत. दिनांक 23 एप्रिल असून या उपक्रमाला साव ले-आऊट जगन्नाथबाबा नगर येथून सुरुवात करण्यात आली. जनविकास महिला आघाडीच्या रूपा बैरम,
मेघा दखणे, रेखा पोलावार, शकुंतला रामटेके, राखी रामटेके, प्रणाली बैरम, उत्कर्षा साव, अरुणा महातळे, मेघा मगरे, रमा देशमुख, रंजना कांबळे, पल्लवी दानी, शांताबाई पेटकर यांच्या उपस्थितीत या मोहिमेला सुरुवात करण्यात आली.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top