Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: रेल्वे गेट सतत बंद राहत असल्याने वेकोलि कामगार त्रस्त
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
रेल्वे गेट सतत बंद राहत असल्याने वेकोलि कामगार त्रस्त इंटक ने दिले स्टेशन अधीक्षकांना निवेदन सौ. मनीषा शर्मा - आमचा विदर्भ प्रतिनिधी भद्रावत...

  • रेल्वे गेट सतत बंद राहत असल्याने वेकोलि कामगार त्रस्त
  • इंटक ने दिले स्टेशन अधीक्षकांना निवेदन
सौ. मनीषा शर्मा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
भद्रावती -
भद्रावती-माजरी मार्गावरील माजरी गावाजवळील 31 क्रमांकाचे रेल्वे गेट सतत बंद राहत असल्यामुळे वेकोली कामगार, माजरी येथील नागरिक तसेच या मार्गावरून वाहतूक करणारे इतर नागरिक त्रस्त झाले आहे. हा सततचा होणारा त्रास यावर काहीतरी उपाययोजना करून बंद करावा व कामगार तथा नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी वेकोलि माजरी येथील राष्ट्रीय कोयला खदान मजदूर संघटनेद्वारे माजरी येथील रेल्वे स्टेशन अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
सदर रेल्वे गेटवे दिवसातून अनेकदा बंद असते दोन दोन तास बंद अवस्थेत असल्यामुळे माजरी  वेकोली शेत्रातील कोळसा खाणीतील कामगारांसाठी हे गेट फार मोठी डोकेदुखी ठरली आहे. या परिसरातून जवळपास 800 वेकोली कामगार या मार्गाने आपापल्या कामावर येत असतात मात्र गेट बंद राहत असल्याने त्यांना त्रास सहन करावा लागतो याशिवाय माजरी पाटाळा या गावातील नागरिकांना याच गेट वरून भद्रावती येथे दररोज अनेक कामानिमित्त यावे लागते. एखाद्यावेळेस वैद्यकीय इमर्जन्सी निर्माण झाल्यास त्यांना या बंद नेटचा सामना करावा लागतो परिणामी रुग्णांना त्वरित इलाज न मिळुन तो  दगावण्याचा धोकाही नाकारता येत नाही. हाच मार्ग पुढे वणी शहराकडे जात असल्याने प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागते. त्यामुळे त्यांचा वेळ वाया जातो ही गंभीर समस्या लक्षात घेता तात्काळ याचे निराकरण करावे अशा मागणीचे निवेदन राष्ट्रीय कोयला खदान मजदूर संघ इंटकचे माजरी क्षेत्राचे अध्यक्ष धनंजय गुंडावार यांच्या नेतृत्वात रेल्वे अधीक्षकांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष धनंजय गुंडावार, सचिव परमानंद चौबे, दिलीप पारखी, देवानंद पिंपळकर, अनिलसिंह आदींची उपस्थिती होती. सदर निवेदनाची प्रतिलिपी प्रतीलीपी चंद्रपूर, वणी, आर्णी क्षेत्राचे खासदार बाळूभाऊ धानोरकर व डीआरएम सेंट्रल रेल्वे नागपूर यांना पाठविण्यात आलेली आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top