Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: बल्हारशाह येथून 11 एप्रिल पासून मुंबईसाठी थेट रेल्वे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
बल्हारशाह येथून 11 एप्रिल पासून मुंबईसाठी थेट रेल्वे भविष्यात कलकत्ता, मद्रास, बंगलोर, नवी दिल्ली साठी बल्हारशाह येथून थेट रेल्वे माझे स्वप्...
  • बल्हारशाह येथून 11 एप्रिल पासून मुंबईसाठी थेट रेल्वे
  • भविष्यात कलकत्ता, मद्रास, बंगलोर, नवी दिल्ली साठी बल्हारशाह येथून थेट रेल्वे माझे स्वप्न - हंसराज अहीर
  • बल्हारशाह येथून सोमवार, बुधवार, शुक्रवार ला रात्री 09.30 वाजता सुटेल
  • दादर येथून मंगळवार, गुरुवार, शनिवार ला रात्री 9.45 वाजता सुटेल
  • प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
चंद्रपूर -
पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री श्री हंसराज अहीर यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांच्या सोयीकरीता पूणे, मुंबई करीता थेट रेल्वे गाडी, अनेक गाड्यांचे चंद्रपूर रेल्वे स्थानकांवर थांबे मंजूर केलेले आहेत. बल्हारशाह रेल्वे स्थानक येथे पिटलाईन त्यांनी मंजूर केली होती. सदर पिटलाईनचे काम आता पूर्ण झाले असून 11 एप्रिल पासून बल्हारशाह येथून मुंबई साठी आठवड्यातून तीन दिवस मुंबई साठी रेल्वे धावणार आहे. पिटलाईन चे कार्य हे अहीर यांच्या दुरदृष्टीचे व अथक परिश्रमाचे फलित आहे.
हंसराज अहीर यांच्या प्रयत्नाने याआधी पूणे व मुंबईसाठी काजिपेठ येथून ट्रेन सुरु करण्यात आली आहे. बल्हारशाह येथे पिटलाईन झाल्याशिवाय बल्हारशाह येथून कोणत्याही भागात थेट ट्रेन सुरु करणे शक्य नसल्याचे लक्षात येताच त्यांनी पिटलाईन मंजूर करुन घेतली आणि आता बल्हारशाह येथे पिटलाईन चे काम पूर्ण होत असल्याने बल्हारशाह येथून पूणे, मुंबई साठी गाड्या सुरु होत आहेतच सोबतच येत्या काळात कलकत्ता, मद्रास, बंगलोर, दिल्ली या मेट्रो शहरांना सरळ रेल्वे सुरु करणार असल्याचे अहीर यांनी म्हटले आहे.
पिटलाईनमुळे बल्हारशाह रेल्वे स्थानकास अनन्यसाधारण महत्व प्राप्त होणार असून देशातील महत्वपूर्ण रेल्वेस्थानकांपैकी एक रेल्वे स्थानक होणार असे माझे स्वप्न असल्याचेही अहीर म्हणाले.
11 एप्रिल पासून बल्हारशाह ते दादर रेल्वे सुरु होणार असून बल्हारशाह येथून सोमवार, बुधवार, शुक्रवार ला रात्री 09.30 वाजता सुटेल आणि दादर येथे दुसऱ्या दिवशी दुपारी 01.25 ला पोहचणार आहे. आणि दादर येथून मंगळवार, गुरुवार, शनिवार ला रात्री 9.45 ला सुटेल व बल्हारशाह येथे दु. 01.30 पोहचणार आहे. बल्हारशाह येथून थेट रेल्वे सुरु होत असल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे हंसराज अहीर यांनी आभार मानले आहे. रेल्वे सुविधेकरीता सदैव तत्पर असणारे पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचे चंद्रपूर व बल्हारशाह रेल्वे सुविधा संघर्ष समितीच्या पधाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी आभार मानले व अभिनंदन केले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top