Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: मोबाईलचा स्फोट होऊन महिलेचा मृत्यू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मोबाईलचा स्फोट होऊन महिलेचा मृत्यू वाचा कोणत्या चुकीमुळे झाली घटना आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स नवी दिल्ली - रात्री फोन चार्जिंगला लावून झ...

मोबाईलचा स्फोट होऊन महिलेचा मृत्यू
वाचा कोणत्या चुकीमुळे झाली घटना
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
नवी दिल्ली -
रात्री फोन चार्जिंगला लावून झोपण्याची सवय अनेकांना असते. रात्री फोन चार्जिंगला लावून सकाळपर्यंत तो तसाच चार्ज होत राहतो. परंतु ही सवय जीवावरही बेतू शकते. नुकतीच अशी एक घटना समोर आली असून एका महिलेचा यात मृत्यू झाला असून दोन मुलं गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये ही दुर्घटना घडली. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली. रात्री महिला आपल्या दोन मुलांसह खाटेवर झोपून मोबाइल पाहत होती.
मोबाइल पाहताना महिलेने मोबाइल चार्जिंग प्लगमध्ये लावला होता. त्यानंतर मोबाइल तसाच चार्जिंगला ठेवून ती झोपली. पण मध्यरात्री मोबाइल किंवा चार्जरमध्ये करंट आल्याने मोठा ब्लॉस्ट झाला. महिला आणि तिची दोन मुलं या करंटमध्ये आल्याने हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली. करंट लागल्याने महिला आणि दोन्ही मुलं ओरडू लागली. त्यांचा आवाज ऐकून महिलेचा पती बाहेर आला, त्यावेळी पत्नी आणि मुलं बेशुद्ध अवस्थेत आढळले. तिघांनाही रात्री प्राथमिक स्वास्थ केंद्रात नेण्यात आलं. परंतु डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केलं. तर दोन पाच आणि आठ वर्षांच्या मुलांवर उपचार सुरू आहेत.
मोबाइल कधीही रात्रभर चार्जिंगसाठी ठेवू नका. यामुळे मोबाइलची बॅटरी खराब होऊ शकते. मोबाइलच्या अधिकच्या वापरामुळे अनेकांना सतत मोबाइल चार्ज करावा लागतो. त्यामुळे अनेक जणांना मोबाइल रात्रभर चार्जला ठेवून सकाळी संपूर्ण चार्ज झालेला फोन वापरायची सवय असते. परंतु रात्रभर चार्ज केल्याने ओव्हर चार्जमुळेही मोबाइल ब्लास्ट होतो. रात्रभर चार्जिंगमुळे मोबाइल ब्लास्ट होण्याचा धोका निर्माण होतो. ओव्हर चार्जिंग फोनसाठी धोकादायक ठरतं. यामुळे बॅटरी लाइफ कमी होतं. तसंच फोनवरही याचा परिणाम होतो.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top