Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: दुचाकीस्वारावर वाघाचा हल्ला ; बालापूर मार्गावरील थरार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
दुचाकीस्वारावर वाघाचा हल्ला बालापूर मार्गावरील थरार आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स नागभीड - नागभीड तालुक्यातील कोटगांव येथील सुरज रंधये (28)...

  • दुचाकीस्वारावर वाघाचा हल्ला
  • बालापूर मार्गावरील थरार
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
नागभीड -
नागभीड तालुक्यातील कोटगांव येथील सुरज रंधये (28) हा 10 फेब्रुवारीला सकाळच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून बालापूर मार्गावरून म्हसली ला जात असतांना रस्ता कच्चा असल्याने वाहन सावकाश चालवित जात होता. मात्र वाटेतच दबा धरून बसलेल्या वाघाने सुरजवर झडप घेतली. मात्र, नवीन बलवंत्तर म्हणून सुरज थोडक्यात बचावला. सुरज हा बालापूर मार्गावरून म्हसलीला जायला निघाला होता. रस्ता कच्चा असल्याने तो वाहन सावकाशपणे चालवित होते. दरम्यान वाटेतच दबा धरून बसलेल्या वाघाने सुरजच्या वाहनावर झडप घेतल्याने तो खाली पडला. याकारण वाहनाची मागील सीट फाटली. मात्र, सुरजचे वाहन सुरूच होते. वाघही वाहनजवळ उभा होता. मात्र, हिम्मत करित तो वाहनावर बसला व बालापूर मौशी मार्गे कोटगावला कसाबसा पोहचला. मात्र, घडलेल्या अपघातामुळे तो फार घाबरलेला होता. घरी पोहचताच त्याला भोवळ आली व तो खाली पडला. त्याच्या शरीराचा थरकाप उडाला होता. त्याने घडलेला प्रकार कुटुंबियांना सांगितला. वाहनावरून पडल्याने पायाला जखम झाली आहे. मात्र शेवटी नबीश बलवंत्तर म्हणून सुरजचे प्राण वाचले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top