Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची संयुक्त जयंती साजरी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची संयुक्त जयंती साजरी प्रवृत्ती फाउंडेशन राजुरा चे आयोजन विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी राजुरा...

  • राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची संयुक्त जयंती साजरी
  • प्रवृत्ती फाउंडेशन राजुरा चे आयोजन
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
प्रवृत्ती फाउंडेशन राजुरा द्वारे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती जनसंपर्क कार्यालयात साजरी करण्यात आली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मा जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी छावा फोउंडेशन चे अध्यक्ष आशीष करमनकर, हजरत टिपू सुलतान फाउंडेशन राजुरा चे अध्यक्ष असलम चाऊस, मराठा सेवा संघ तथा चांदगड फोर्मर प्रोड्युसर कंपनी राजुरा चे दिनेश पारखी, ओबीसी 
समन्वय समिती राजुराचे अध्यक्ष उत्पल गोरे, स्वराज्य आधार फोउंडेशन राजुरा चे प्रतिक कावडे, प्रवृत्ती फोउंडेशन राजुरा तालुका अध्यक्ष सुरज भांबरे, आमचा विदर्भ न्यूज पोर्टलचे प्रतिनिधी विरेंद्र पुणेकर उपस्थित होते. 
कार्यक्रमाची सुरवात स्वराज्य जननी राज माता माँ जिजाऊ व स्वामी विवेकानंद या महामानवांना मान वंदना देऊन करण्यात आली. आशिष करमनकर यांनी सांगितले कि मा जिजाऊंचा आदर्श व स्वामी विवेकानंद यांचे महान विचार आपल्या दैनंदिन जीवनात आत्मसात करावे. विरेंद्र पुणेकर यांनी युवकांना आता नोकरी सोबतच राजकारण व व्यवसायाकडे वाढायला हवे असे सांगितले. दिनेश पारखी यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले कि, ओबीसींची जातनिहाय हातात घेऊन गावोगावी ओबीसीं लोकांत जनगणने बाबत प्रबोधन करून नवी क्रांती घडवण्याचे काम हाती घ्यावे लागेल. 
आभार सुरज भांबरे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्रवृत्ती फोउंडेशन राजुराच्या सभासदांनी परिश्रम घेतले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top