Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अवकाळी पावसाने शेतकरी रडकुंडीला
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अवकाळी पावसाने शेतकरी रडकुंडीला या वर्षात दोनदा पावसाने शेतकऱ्याचं केलं वाटोळं खरीप रब्बी दोन्हीही पीक बरबाद पहिल्या पावसात कापूस बरबाद आणि ...

  • अवकाळी पावसाने शेतकरी रडकुंडीला
  • या वर्षात दोनदा पावसाने शेतकऱ्याचं केलं वाटोळं
  • खरीप रब्बी दोन्हीही पीक बरबाद
  • पहिल्या पावसात कापूस बरबाद आणि या अवकाळी पावसात चना बरबाद
  • शेतपिके झाली भुईसपाट ; बळीराजाला मोठा आर्थिक फटका
  • तुर, हरबरा, लाखोळी व मिरची पिकाचे मोठे नुकसान
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
जिल्ह्यात तीन दिवसाच्या ढगाळ वातावरणानंतर आज झाले सूर्यदेवाचे दर्शन झाले मात्र जिल्ह्यात दोन दिवसापासून झालेल्या अवकाळी पावसाने शेतपिके भुईसपाट झाली आहेत. बळीराजाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. उध्वस्त झालेली पिके बघून बळीराजा रडकुंडीस आला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात सोमवार, मंगळवार व बुधवारला अवकाळी पाऊस बरसला. जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरु होती. जिल्ह्यातील काही भागात जोरदार तर मध्यम स्वरूपाचा सरी बरसल्या. या पावसाने शेतपिकांचे मोठे नुकसान केले.
चिमुर तालुक्यातील पळसगाव परिसरात जोरदार पाऊस झाला. तुर, हरबरा, लाखोळी या पिकांना पाऊस मारक ठरला आहे. राजुरा तालुक्यात येणाऱ्या भेंडवी परिसरात पावसामुळे मिरची पिकाचे मोठे नुकसान झाले. मुल, सावली तालुक्यात भाजीपाला भुईसपाट झाला आहे. गोंडपिपरी तालुक्यात मजूरांची समस्या मोठी आहे, त्यामुळे आजही अनेक शेतातील कापूस वेचणी बाकी आहे. अवकाळी पावसाने कापूस पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतपिकांचे मोठे नुकसान केले. मायबाप सरकार मदतीचा हात पुढे करेल अशी अपेक्षा बळीराजाने ठेवली आहे.

जिल्ह्यात पिकांची स्थिती
जिल्ह्यात 1 लाख 5 हजार 424 हेक्टरची पेरणी झालेली आहे. हरबरा पिकाची एकुण पेरणी 53 हजार 864 हेक्टरमध्ये झाली आहे. ज्वारी पिकाची पेरणी 2500 हेक्टर आहे. अद्याप काही पेरणी बाकी आहे. सध्या सुरु असलेला अवकाळी हरबरा, ज्वारी, करडई पिकासाठी उपयुक्त असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top