Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: एसटी कामगारांच्या आंदोलनाला वंचितचा पाठिंबा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
एसटी कामगारांच्या आंदोलनाला वंचितचा पाठिंबा वंचित बहुजन आघाडीची आंदोलनस्थळी भेट विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी राजुरा - एसटी कामगार...










  • एसटी कामगारांच्या आंदोलनाला वंचितचा पाठिंबा
  • वंचित बहुजन आघाडीची आंदोलनस्थळी भेट
विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
एसटी कामगारांच्या आंदोलनाला दोन आठवडे पूर्ण होत आली असून राज्य शासनाने एसटी कामगारांन करिता दिलासादायक निर्णय अजून घेतला नाही. यामुळे एसटी कामगार संपावर कायम आहेत. आंदोलनाच्या पंधराव्या दिवशी वंचित बहुजन आघाडी शाखा राजुराने सदिच्छा भेट देत येत्या तीन दिवसात एसटी कामगार समर्थीत जनजागृती रॅली काढत कामगारांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधणार आहे.
एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीला घेऊन एसटी कर्मचाऱ्यांचे संपूर्ण महाराष्ट्रभर बेमुदत संप व आंदोलन सुरू आहे. वंचित बहुजन आघाडी तालुका राजुरा च्या वतीने एसटी आगार राजुरा येथे सदिच्छा भेट देऊन आंदोलनास जाहीर पाठिंबा देऊन शुभेच्छा व पाठबळ दिले.
एसटी कामगारांच्या बेमुदत संपामुळे सामान्य जनतेच्या प्रवासात अडचण निर्माण झाली असून शाळकरी मुले, वयोवृद्ध, सामान्य जनतेला अडचणींचा सामना करावा लागत आहे. सामान्य कुटुंबातून एसटी महामंडळात नोकरीला असलेल्या कामगारांना तोकड्या मानधनात सेवा द्यावी लागत आहे. यामुळे राज्यातील एसटी कामगारांना दिलासा मिळण्यासाठी विलनिकरण करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन अजूनच चिघळत चालले आहे. मात्र गेंड्याची कातडी पांघरलेल्या राज्य शासनाची कुंभाकर्णी झोप उघडेल कधी...? 
राजुरा आगारातील पाच कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. सामान्य जनतेच्या प्रवासाची हक्काची लालपरी रस्त्याने कधी धावेल याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र कुळमेथे, तालुका निरीक्षक भगीरथ वाकडे, तालुका अध्यक्ष सुशील मडावी, उपाध्यक्ष धनंजय बोर्डे, महासचिव सदानंद मडावी, आयटी सेल प्रमुख अमोल राऊत, प्रणित झाडे, वासुदेव मावलीकर, रविकिरण बावणे, वाघू वनकर आदी उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top