Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: पोंभुर्णा तालुक्‍यातील नरभक्षक वाघाला त्‍वरित जेरबंद करावे- आ. सुधीर मुनगंटीवार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पोंभुर्णा तालुक्‍यातील नरभक्षक वाघाला त्‍वरित जेरबंद करावे- आ. सुधीर मुनगंटीवार आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स चंद्रपूर - पोंभुर्णा तालुक्‍य...
पोंभुर्णा तालुक्‍यातील नरभक्षक वाघाला त्‍वरित जेरबंद करावे- आ. सुधीर मुनगंटीवार
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
चंद्रपूर -
पोंभुर्णा तालुक्‍यात धुमाकुळ घालणाऱ्या नरभक्षक वाघाला वनविभागाने तातडीने जेरबंद करावे अन्‍यथा भारतीय जनता पार्टी तिव्र जनआंदोलन छेडेल असा इशारा विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिला आहे.
यासंदर्भात आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर वनवृत्‍ताचे मुख्‍य वनसंरक्षक व सर्व सबंधीतांना सुचना दिल्‍या आहेत. पोंभुर्णा तालुक्‍यातील कसरगट्टा, गंगापूर, बोर्डा बोरकर, घनोटी या गावांमध्‍ये गेल्‍या ८ दिवसापासून नरभक्षक वाघाचा धुमाकुळ सुरु आहे. या वाघाच्‍या हल्‍ल्‍यात आतापर्यंत ८ व्‍यक्‍ती जखमी झाले असुन दोन व्‍यक्‍ती मृत झाले आहेत. यामुळे पोंभुर्णा तालुक्‍यातील नागरिकांमध्‍ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावकरी जीव मुठीत घेवुन जगत आहेत. सदर नरभक्षक वाघाला तातडीने जेरबंद करणे आवश्‍यक आहे. वनविभागाचे याकडे अक्षम्‍य दुर्लक्ष होत आहे. सदर वाघाला तातडीने जेरबंद करत नागरिकांना दिलासा देण्‍याची मागणी मा. सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top