Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: पोषण आहार अभियाना अंतर्गत जनजागृती संपन्न
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शहरातील 18 अंगणवाड्या नप ला हस्तांतरित झाल्यास अधिक आधुनिक सुविधा पुरविल्या जातील - विक्रम येरने दरवर्षी 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर हा कालावध...
  • शहरातील 18 अंगणवाड्या नप ला हस्तांतरित झाल्यास अधिक आधुनिक सुविधा पुरविल्या जातील - विक्रम येरने
  • दरवर्षी 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर हा कालावधी "पोषण मास'' म्हणून साजरा करण्यात येतो
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
नगर परिषद गडचांदुर येथील प्रभाग क्रमांक 3 मधील अंगणवाडी केंद्र क्रमांक 18 येथे पोषण आहार अभियानाअंतर्गत जन जागृती अभियान कार्यक्रम नगरसेवक तथा गटनेते विक्रम नामदेवराव येरणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न. महाराष्ट्र शासनाच्या बाल विकास प्रकल्प कार्यालय कोरपना अंतर्गत दरवर्षी 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर हा कालावधी "पोषण मास'' म्हणून साजरा करण्यात येतो. विविध अंगणवाड्यांमध्ये शासनाच्या उपलब्ध सोयी सुविधां बाबत सदर कालवधीत जनजागृती करण्यात येत असते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात नगरसेवक विक्रम येरणे यांनी शासनाने लहान बालक गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांच्या संपूर्ण पोषणाची जवाबदारी स्वीकारली असून कुणालाही पोषण आहारापासून वंचित ठेवले जाणार नाही अशी माहिती दिली. कोरोना काळात अंगणवाड्या बंद असताना सुद्धा लाभार्थ्यांना घरपोच सुविधा पुरविल्या बद्दल सर्व अंगणवाडी सेविका व मदतनिसांचे त्यांनी आभार मानले. नगर परिषद ने शहरात ११ ठिकाणी लहान मुलांकरिता खेळण्याचे साहित्य लावले असून त्यात अंगणवाडी केंद्रांना प्राधान्य देण्यात आले असून पुढे  उर्वरित आंगणवाडी परिसरात खेळण्याचे साहित्य लावली जाणार असल्याचे सांगितले. गडचांदूर शहरातील अठरा ही अंगणवाड्या नगर परिषद ला हस्तांतरित झाल्यास अधिक आधुनिक सुविधा पुरविल्या जातील व त्याबाबत पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली. कार्यक्रमात विविध पोषक आहारांचे प्रदर्शन आणि त्यांची बनवण्याची पाककृती उपस्थित महिलांना समजावून सांगण्यात आली.
कार्यक्रमास सौ. ताराबाई तिखट, सौ. इंदिराबाई कोंडेकर, सौ. करिश्मा बांगडे, फातिमा बी, सौ. बाशुमिया सौ. ठाकरे, अंगणवाडी सेविका सौ. योगिता चिमणकर सौ. पुष्पा ठेपाले, सौ. सुनंदा चौधरी मदतनीस सरिता रहांगडले सोबतच स्तनदा माता, बालक व गरोदर महिला लाभार्थी उपस्थित होते. संचालन लता अहिरकर तथा आभार प्रदर्शन अंगणवाडी सेविका सौ. सुवर्णा गिरडकर यांनी मानले. 





About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top