- रानभाजी महोत्सवाचे उदघाटन ; तालुका कृषी विभागाचा पुढाकार
राजुरा -
दि. 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये जिल्ह्यात रानभाजी महोत्सव राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रानभाज्या आढळून येत असल्याने तसेच रानभाज्या आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त असल्याने रानभाज्यांचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचविणे व त्यातून आदिवासी शेतकऱ्यांना उत्पन्नाचे स्त्रोत मिळावे यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर कृषी विभागाच्या वतीने रानभाजी महोत्सव राबविण्यात येत आहे.
दिनांक 9 ऑगस्ट ला जागतिक आदिवासी दिनानिमित्त रानभाजी महोत्सव सप्ताहचे आयोजन तालुका कृषी विभागाकडून आयोजित करण्यात आले आहे. रानभाज्यांमध्ये कंदभाज्या जसे की, करांदे, कणगर, कडूकंद, कोनचाई, कडू इत्यादी भाज्या तर हिरव्या भाज्यांमध्ये तांदूळजा, काठेमाठ, कुडा, टाकळा, कोहळा, कुई, घोळ, कवळा, लोधा इत्यादी, फळभाज्यांमध्ये करटोली, वाघेडा, चिचुर्डी, पायार, मोह, कपाळफोडी, काकड इत्यादी तर फुलभाज्यांमध्ये कुडा, शेवळ व उळशी तसेच विदर्भातील तरोटा, कुड्याच्या शेंगा या रानभाज्यांची ओळख आरोग्याच्या दृष्टीने त्यांचे महत्त्व, पाककृती इत्यादी विषयी माहिती शहरी भागातील नागरिकांना तसेच उपस्थित लोकांना देण्यात आली.
यावेळी आमदार सुभाष धोटे, जिप कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील उरकुडे, पंस उपसभापती मंगेश गुरनुले, पंस माजी सभापती कुंदाताई जेनेकर, उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, उपविभागीय कृषी अधिकारी गोविंद मोरे, तहसीलदार हरीश गाडे, तालुका कृषी अधिकारी विठ्ठल मकपल्ले, निसर्ग महिला गट राजुरा, अंबुजा सिमेंट फाऊंडेशन उपरवाही, भूमिपुत्र शेतकरी प्रोड्युसर कंपनी लिमिटेड राजुरा, साफल्य शेतकरी उत्पादन कंपनी हरदोना यांचे प्रतिनिधी हे उपस्थित होते. सूत्रसंचालन मंडळ कृषी अधिकारी चेतन चव्हाण यांनी तर आभार तालुका कृषी अधिकारी विठ्ठल मकपल्ले यांनी केले.













टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.